Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा?; संजय राऊत म्हणतात…

13

हायलाइट्स:

  • आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची तयारी
  • महापालिका निवडणुकीबद्दल राऊतांचे वक्तव्य
  • दसरा मेळाव्यावरही दिली प्रतिक्रिया

मुंबईः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरल असला तरी भाजपने महत्त्वाच्या जागा गमावल्या आहेत. तर, एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळं आगामी निवडणुकांतही महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढवणार का?, अशी चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

मुंबईत शिवसेनेचा विस्तार व्हावा ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. म्हणून शिवसेना स्वबळावर लढत आहे. आम्ही स्वबळावर लढलो. शिवसेना मोठा पक्ष आहे. शंभरीपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय. मुंबई महापालिकेत शिवसेनेची ताकद असेल. मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल. पाच वर्षांपूर्वी निवडणूकही आमच्या ताकदीवर आम्ही लढलो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुंबई शिवसेनेचे जन्मस्थान आहे. त्या महापालिकेवर शिवसेनेचं राज्य नसेल तर कोणाचं राज्य असेल? आमचंच राज्य असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वाचाः मंडप सजून ठेवलाय, योग्य वेळी बँड लावून आम्ही..; ‘या’ नेत्याचे सूचक वक्तव्य

दसरा मेळावा जल्लोषात होणार

दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने होईल. हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही देखील तशी तयारी करत आहोत. फटाके वगैरे फोडून जल्लोषात हा मेळावा होईल. आता हळहळू मंदिरे उघडली आहेत. नियम पाळून सण साजरे होत आहेत. दसरा मेळावाही होईल. पण कुठे होणार हे आता सांगू शकत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

वाचाः मुंबई विमानतळावर गोंधळाचे वातावरण; अलोट गर्दीमुळं चेंगराचेंगरीसारखी स्थिती

अपना टाइम भी आयेगा

ही राजकीय छापेमारी असेल किंवा आयकर असेल, सीबीआय असेल, ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.