Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Exit polls: भाजपच्या ‘४०० पार’ घोषणेला बसू शकतो धक्का, या जागांवर विजय मिळाल्यास ठरेल बोनस

2

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज १ जून रोजी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पाडले. यावेळी भाजपने ४०० पार अशी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवार तिसऱ्यांदा लोकसभेवर जाण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या दोन निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. आता त्यांनी ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या या मोहिमेला मोठा धक्का बसू शकतो.

देशात असे अनेक राज्या आहेत जेथे भाजप किंवा त्यांची आघाडी असलेल्या एनडीए आघाडीला एक देखील जागा मिळणार नाही. जाणून घेऊयात अशी कोणती राज्ये आहेत जेथे भाजपला एकही जागा मिळणार नाही आणि त्यामुळे तडजोड करावी लागू शकते.

केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा आहेत. २०१९च्या निवडणुकीत काँग्रेस आणि मित्र पक्षांनी येथे १९ जागा जिंकल्या. तर डाव्या पक्षाला एक जागा मिळवता आली. मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार अधिक असलेल्या राज्यात भाजपला अद्याप एकही जागा जिंकता आलेली नाही. २०१९च्या निवडणुकीत भाजपला १३ टक्के मते मिळाली होती. यावेळी भाजप आणि मोदींनी केरळमध्ये जास्त जोर लावला आहे. त्यांना मिळणाऱ्या मतांची संख्या वाढू शकेत पण जागा मिळेल का याबाबत शंका आहे.

केरळनंतर गोव्या सारख्या छोट्या राज्यात जिथे फक्त २ जागा आहेत एक उत्तर गोवा, दुसरे दक्षिण गोवा होय. या दोन्ही जागांवर विजय आणि पराभवाचे अंतर फार कमी असते. २०१४ साली भाजपने या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. पण २०१९ मध्ये भाजपने दक्षिण गोव्याची जागा गमावली होती. यावेळी भाजपने दक्षिण गोव्यातून महिला उमेदवार पल्लवी डेम्पो यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी देखील पक्षाला दोन्ही जागा मिळवणे अवघड दिसेत.
Exit polls 2024: एक्झिट पोलचे २०१९ चे अंदाज काय होते? कुणाची भविष्यवाणी खरी ठरली होती?

मेघालय राज्यात भाजपने एकही उमेदवार उभा केला नाही. येथे भाजपची नॅशनल पिपल्स फ्रंटसोबत युती आहे. २०१९मध्ये येथील एक जागा काँग्रेस तर दुसरी एनपीपीने जिंकली होती. २०१४ ला देखील असाच निकाल लागला होता. २०२४ साठी काँग्रेसने दोन्ही जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची लढत थेट एनपीपी विरुद्ध आहे.

मिझोराममध्ये लोकसभेची एक जागा आहे. येथे भाजपने प्रदेश अध्यक्ष वनलालह्य्मुअका यांना उमेदवारी दिलीआहे. २०१९ साली ही जागा मिझो नॅशनल फ्रंटने जिंकली होती. २०१४ मध्ये काँग्रेसने बाजी मारली होती. आता ही एकमेव जागा जिंकण्याचे आव्हान भाजपसमोर असेल.

नागालँडमध्ये लोकसभेची एक जागा आहे आणि भाजपने येथे उमेदवार उभा केलेला नाही. २०१९ साली ही जागा एनडीपीपीच्या तोखेहो येप्थोमी यांनी विजय मिळवला होता.

मणिपूरमध्ये लोकसभेच्या २ जागा आहेत आणि भाजपने येथे एका जागेवर उमेदवार उभा केलाय. अंतर्गत मणिपूर ही जागा भाजप लढवत आहे. २०१९ मध्ये भाजपने येथे एक जागा जिंकली होती. भाजपला यावेळी काँग्रेसकडून चांगली टक्कर मिळू शकते.

लक्षद्वीप, पुड्डूचेरी येथे भाजपला फार संधी आहे असे दिसत नाही. लक्षद्वीपमध्ये भाजपने अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय. पुड्डुचेरीत गृहमंत्री ए नमसिवायम यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजपची लढत थेट काँग्रेस विरुद्ध आहे. २०१९ मध्ये भाजपला किंवा एनडीएला येथे विजय मिळवता आला नव्हता.

वरील राज्यातील जागांवर भाजपचा पराभव झाला तर त्यांना फार फरक पडणार नाही. कारण येथील जागा फार कमी आहेत. पण जर येथे विजय मिळाला तर भाजपसाठी तो बोनस असेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.