Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

इंडिया आघाडी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करेन, राहुल गांधींचे सरकार बनविण्याचे संकेत

5

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीने देश चालवू नये, ही तमाम जनतेची इच्छा आहे, हे आजच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. आजचा निकाल ही परिवर्तनाची नांदी आहे. आम्ही कोणत्याही एका पक्षाविरोधात निवडणूक लढलो नाही तर बेकायदा वागणाऱ्या संस्थांविरोधात आम्ही निवडणूक लढलो. आमची लढाई संविधान वाचविण्याची होती. दलित, मुस्लीम, आदिवासी आणि गोरगरीब लोकांनी संविधान वाचविण्याच्या लढाईत सर्वाधिक योगदान दिले आहे. देशाने मोदी-शाहांना नाकारल्यानंतर आम्ही इंडिया आघाडी म्हणून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सरकार बनविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे अप्रत्यक्ष संकेतच दिले.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक निकालात इंडिया आघाडीने नेत्रदीपक यश मिळवून भाजपचा विजयी वारू रोखला. ज्या उत्तर प्रदेशकडून भाजपला सर्वाधिक अपेक्षा होत्या, तिथेच समाजवादी पक्षाने भाजपला धक्का देऊन सर्व स्वप्ने धुळीस मिळवली. अगदी राममंदिराचा कोणताही परिणाम उत्तर प्रदेशमध्ये झाला नाही. देशभरात इंडिया आघाडीने जवळपास २३५ जागा जिंकल्या आहेत. या सगळ्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा स्पष्ट केली.
जनतेला बदल हवाय, राहुल गांधींच्या यात्रेने सरकारविरोधी भावनेला बळ, प्रियांका गांधींना विश्वास

देशाने आज परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलेय

राहुल म्हणाले, “मोदी-शाहा यांनी देश चालवू नये, ही जनतेची इच्छा आहे. आजच्या निकालातून तेच स्पष्ट झालेय. आम्ही कोणत्याही पक्षाविरोधात लढत नव्हतो तर संस्थांविरोधात आम्ही दोन हात करत होतो. संविधान वाचविण्याची आमची लढाई होती. देशाने आज परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलेय”

जनतेने मोदी शहांना नाकारल्यानंतर इंडिया आघाडी आता दिलेली आश्वासने पूर्ण करेन

“इंडिया आघाडीच्या वाट्याला आलेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि सहकारी पक्षाच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांच्या अफाट मेहनतीचे यश आहे. निवडणूक काळात त्यांनी केलेल्या मेहनतीचे चीज झाले. जनतेने मोदी शहांना नाकारल्यानंतर इंडिया आघाडी आता जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करेन”, असे राहुल गांधी म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.