
Tej Police Times
काश्मीर खोऱ्यात मागील पाच दिवसांत दहशतवाद्यांनी सात नागरिकांची हत्या केली आहे. यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेनंही भाजप व केंद्र सरकारवर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे.
‘इतर राज्यांत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांच्या नाड्या आवळता येतात, पण कश्मीर खोऱ्यातील अतिरेक्यांच्या बाबतीत तेही करता येत नाही. भाजपचे लोक नशेखोरांना अमली पदार्थांच्या साठ्यासह पकडून देतात, ईडीला कारवाया पुढे रेटण्यात मदत करतात. एवढेच नव्हे, तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी खासगी आर्मी उभारावी असे जाहीर सल्लेही त्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना देतात,’ असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
‘कश्मीर पुन्हा हिंसाचाराच्या ज्वालामुखीवर उभे आहे. नोटाबंदी केल्यामुळे दहशतवाद थांबेल असे केंद्र सरकार सांगत होते. नोटाबंदीमुळे बनावट नोटांचे उत्पादन थांबेल व अतिरेक्यांची आर्थिक रसद तुटेल असे सांगितले गेले, ते खरे ठरले नाही. त्यानंतर ३७० कलम हटवले. ३७० कलम हटवल्याने खोऱ्यातील हिंसाचारालाच आळा बसेल व पाकड्यांचे धाबे दणाणेल, असा दावा केला जात होता. तोदेखील फोल ठरला. कश्मीर खोऱ्यातील लोक जीव मुठीत धरूनच जगत आहेत. कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत भाजपने मोठा गाजावाजा केला. मात्र पंडितांची घरवापसी सोडाच, पण उरलेसुरले पंडितही पलायन करीत आहेत,’ असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
अग्रलेखात काय म्हटलंय?
Recover your password.
A password will be e-mailed to you.