Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन-कोण आऊट? JDU-TDP च्या या नेत्यांची नावं चर्चेत, भाजपकडून कोण?

11

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३.० सरकारचा शपथविधी ९ जूनला (रविवारी) संध्याकाळी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळालेले नसल्याने सरकार चालवण्यासाठी त्यांना आता एनडीएच्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. याचे परिणाम शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या यादीवरही दिसून येईल. यावेळी भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांची संख्या कमी होऊन एनडीएच्या मित्रपक्षांच्या मंत्र्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण, म्हणजे भाजपचे अनेक मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला आहे. यामध्ये स्मृती इराणी आणि आर. के. सिंग सारख्या नेत्यांचाह समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातील तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले राममोहन नायडू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. टीडीपीला मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळावी यासाठी आशा लावून बसले आहेत. तर, दोन राज्यमंत्री पदंही त्यांना देण्यात येणार आहे. मात्र, टीडीपी पक्षाने दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदांची मागणी केली आहे. याशिवाय, उपसभापतीपदाचीही डिमांड ठेवली जाण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar: चेकमेट! ना शरद पवारांकडे परतू शकत, ना महायुतीत मुख्यमंत्री होऊ शकत, आता अजित पवार काय करणार?
एनडीएतील आणखी एक महत्त्वाचा मित्रपक्ष म्हणजे जनता दल यूनायटेडही यावेळी संधी साधण्याच्या तयारीत आहे. जेडीयूचेही अनेकजण मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. त्यापैकी ललन सिंह आणि केसी त्यागी यांचं नाव चर्चेत आहे. मात्र, जेडीयूच्या कोट्यातून कोण मंत्री होणार याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हातात आहे. नितीशकुमार यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा वाटा हवा आहे, हे त्यांच्या निर्णयांवरुन दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी एनडीएच्या बैठकीत याबाबतचा फॉर्म्युलाही मांडला. त्यानुसार, त्यांना प्रत्येक ४ खासदारांमागे एक मंत्रीपद हवं आहे. जेडीयूला १२ जागा मिळाल्या आहेत. नितीश कुमारांच्या प्रस्तावानुसार, ते ३ मंत्रिपदांची मागणी करू शकतात.

त्याचप्रमाणे बिहारमधून एनडीएमध्ये असलेले चिराग पासवान आणि जीतन राम मांझी हे देखील उद्या शपथ घेऊ शकतात, अशी माहिती आहे. उत्तर प्रदेशात अपना दलाच्या अनुप्रिया पटेलही शपथ घेऊ शकतात. त्याचबरोबर आंध्र प्रदेशातील पवन कल्याण यांना मिळालेले महत्त्व पाहता तेही मंत्री होणार असल्याची शक्यता आहे.

तर, यावेळी भाजपच्या मंत्र्यांची संख्या कमी होणार हे निश्चित आहे. भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश असणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, पीयूष गोयल, हरदीप सिंग पुरी, अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, प्रल्हाद जोशी आणि मनसुख मांडविया हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. आता मोंदींच्या मंत्रिमंडळात नेमकी कोणाकोणाची वर्णी लागते आणि कोणाला आऊट केलं जातं हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.