Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात फसवणुकीची याचिका; कोर्ट तक्रारदाराला म्हणाले…

12

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मोठा दिलासा
  • नगर कोर्टानं फेटाळली फसवणुकीच्या संदर्भातील याचिका
  • जगताप यांनी मतदारांना फसवल्याची करण्यात आली होती तक्रार

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली एक तक्रार नगरच्या न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आमदारांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाऊंडेशनचे संदीप अशोक भांबरकर यांनी न्यायालयात ही खासगी फिर्याद दाखल केली होती. हे प्रकरण या न्यायालयात चालविण्यायोग्य आढळून येत नाही. आवश्यकता वाटल्यास तक्रारदार यासंबंधी निवडणूक याचिका दाखल करू शकतो, असे सांगत वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली.

भांबरकर यांनी १८ सप्टेंबरला ही तक्रार दाखल केली होती. २३ सप्टेंबरला प्राथमिक सुनावणी होऊन न्यायालयाने तक्रार दाखल करून घेतली. या तक्रारीत म्हटले होते की, आमदार जगताप यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी जाहीरनाम्यात त्यांनी नगरमधील आयटी पार्क सुरू केल्याचे म्हटले होते. या आयटी पार्कमध्ये अनेक युवक-युवतींना नोकरी मिळाल्याचा दावाही केला होता. काही युवकांचे आम्हाला आयटी पार्कमध्ये नोकरी मिळाल्याचे व्हिडिओही सादर करण्यात आले होते. यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी यासंबंधी आपण माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली. तेव्हा संबंधित यंत्रणेकडून नगरमध्ये आयटी पार्कच नसल्याचे कळविण्यात आले. एमआयडीसी कार्यालयाकडे आयटी पार्क विषयी आपण माहिती मागितली. त्यामध्ये एमआयडीसी कार्यालयाने आयटी पार्कला आपल्या मार्फत परवानगी देण्यात आली नसल्याचे आपल्याला कळविले. याच अर्थ आमदार जगताप यांनी मतदारांची दिशाभूल केल्याचे दिसून येते,’ असा आरोप भांबरकर यांनी केला होता.

वाचा: सावध राहा! स्वत:चं घर सांभाळा; नवाब मलिक यांचा नीतेश राणेंना सल्ला

आमदार जगताप यांच्यासह सहा जणांना प्रतिवादी करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. पाटील यांच्यासमोर झाली. शनिवारी त्यांनी निकाल दिला. तक्रारीत मतदारांना लालूच दाखविल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. यासाठी तक्रारदाराला निवडणूक याचिका दाखल करण्याचा मार्ग आहे. मात्र, कनिष्ठ न्यायालयात हे प्रकरण चालविण्यायोग्य नाही. तक्रारदारालाही हे दाखवून देता आलेले नाही. कलम १५६ (३) नुसार प्रतिवादींविरूद्ध काहीही आदेश देता येऊ शकत नसल्याने न्यायालयाने ही तक्रार फेटाळून लावली आहे.

वाचा: राहुल गांधींनी संजय राऊतांकडं बोलून दाखवली मनातली ‘ही’ खंत

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.