Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोकसभेत सुसाट कामगिरी करणाऱ्या ‘इंडिया’ला धक्का? १० पैकी ९ जागांवर NDAचा विजय पक्का

11

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीनं सुसाट कामगिरी करत भाजपप्रणीत एनडीएला धक्का दिला. भाजपच्या ६३ जागा घटल्या. त्यामुळे लोकसभेत भाजप बहुमतापासून दूर राहिला. पण लोकसभेत भाजपला धक्का बसला तरीही राज्यसभेत भाजपचा जोर कायम राहणार आहे. राज्यसभा सचिवालयानं १० जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.

राज्यसभा निवडणुकीनंतर भाजप नेतृत्त्वाखालील एनडीए अधिक मजबूत होईल. तर इंडिया आघाडी आणि काँग्रेसचं संख्याबळ घटेल. राज्यसभा पोटनिवडणुकीत सगळ्या जागा भाजपप्रणीत एनडीए आघाडीकडे जाऊ शकतात. ज्या राज्यांमधील जागा रिक्त झाल्या आहेत, तिथे एनडीएची सत्ता आहे. त्यामुळे राज्यसभेतील काँग्रेसचं संख्याबळ दोननं कमी होईल. काँग्रेसचे राज्यसभा खासदार के. सी. वेणुगोपाल आणि दीपेंद्र हुड्डा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. वेणुगोपाल राजस्थानातून, तर हुड्डा हरयाणातून राज्यसभेचे खासदार आहेत. हरयाणा, राजस्थानात भाजपकडे बहुमत आहे.
शहांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग, अँग्री लूकची चर्चा; नेमकं काय घडलं? भाजप नेत्यानं सांगितलं
जेजेपीनं भाजपसोबतची युती तोडल्यानं काही महिन्यांतच राज्यसभेची पोटनिवडणूक होत असल्यानं हरयाणात गेम होऊ शकतो. काँग्रेस हरयाणातून उमेदवार देणार का याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. काँग्रेसनं उमेदवार दिल्यास हुड्डा त्यांच्या मर्जीतील नेत्याला रिंगणात उतरवू शकतात. काँग्रेस पक्ष बिरेंद्र चौधरी, किरण चौधरी यांच्यासारख्या नेत्यांना संधी देऊ शकतो. दोन्ही नेते हुड्डांचे प्रतिस्पर्धी आहेत. काँग्रेसनं उमेदवार दिल्यास राज्यसभा निवडणूक रंगतदार होऊ शकते.

राज्यसभेतील १० जागा रिक्त झाल्या आहेत. पैकी ७ भाजपच्या आहेत. दोन काँग्रेसकडे, तर एक आरएलडीकडे आहे. बिहार, महाराष्ट्र, आसाममधील प्रत्येकी दोन जागा रिक्त आहेत. राजस्थान, त्रिपुरा, हरयाणा, मध्य प्रदेशातील एक-एक जागा रिक्त झाली आहे. काँग्रेसच्या दोन जागाही भाजपला मिळू शकतात. काँग्रेसच्या जागा हरयाणा, राजस्थानातील आहेत. तिथे भाजप सत्तेत आहे. बिहार, महाराष्ट्र, आसाममध्ये भाजप मित्रपक्षांसह सत्तेत आहे. मध्य प्रदेशात भाजपकडे प्रचंड बहुमत आहे. त्रिपुरामध्येही भाजप सत्तेत आहे. बिहारमधील दोन जागांपैकी एक-एक जागा इंडिया आघाडी आणि एनडीएला मिळू शकते. तरीही भाजपकडे १० पैकी ९ जागा जिंकण्याची संधी आहे.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.