Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Air Pollution: वर्षभरात जगात ८१ लाख लोकांचा वायू प्रदूषणाने मृत्यू, भारताची आकडेवारी वाचून धक्का बसेल

8

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतात २०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे तब्बल २१ लाख जणांचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे, यामध्ये पाच वर्षांखालील दीड लाखांहून अधिक बालकांचा समावेश होता. ‘हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट’ (एचईआय) या अमेरिकास्थित संशोधन संस्थेने ‘युनिसेफ’च्या सहकार्याने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

वायुप्रदूषणामुळे झालेले मृत्यू (२०२१मधील)
जगभरात ८१ लाख
(वर्षभरातील एकूण मृत्यूंच्या १२ टक्के)

वायुप्रदूषणामुळे झालेले मृत्यू (२०२१मध्ये)
भारत २१ लाख
चीन २३ लाख
पाकिस्तान २.५६ लाख
बांगलादेश २.३६ लाख
इंडोनेशिया २.२१ लाख
नायजेरिया २.०६ लाख
इजिप्त १.१६ लाख
ना शरीफ ना इम्रान, गाढवं ठरणार पाकिस्तानचे सुलतान, काय आहेत कारणं?
वायुप्रदूषणामुळे पाच वर्षांखालील बालकांचे मृत्यू (२०२१मध्ये)
भारत १,६९,४००
नायजेरिया १,१४,१००
पाकिस्तान ६८,१००
इथिओपिया ३१,१००
बांगलादेश १९,१००

दक्षिण आशियात अधिक धोका

दक्षिण आशियात वायुप्रदूषण हा मृत्यूसाठी सर्वांत मोठा धोका असल्याचे या अहवालावरून समोर आले आहे. उच्च रक्तदाब, आहार आणि तंबाखू या धोक्यांचा क्रमांक त्यानंतर लागतो.

‘पीएम २.५’ घातक
– पीएम २.५ हे प्रदूषक वाईट आरोग्याचे कारण असल्याचे या अहवालाने अधोरेखित केले आहे.
– जगभरात २०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे झालेल्या ८१ लाख मृत्यूंपैकी ७८ लाख मृत्यू केवळ पीएम२.५ प्रदूषक आणि घरगुती प्रदूषकांमुळे झाले आहेत.
– अडीच मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराचे हे प्रदूषण कण फुप्फुसांमध्ये कायम राहतात; तसेच रक्तवाहिन्यांमध्येही प्रवेश करतात. त्यामुळे अनेक अवयवांना बाधा निर्माण करू शकतात. तसेच हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, फुप्फुसाचा कॅन्सर, क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डीसीज (सीओपीडी) यांना कारणीभूत ठरतात.

वायुप्रदूषणाचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात. या अहवालाने वायुप्रदूषणाच्या मानवी आरोग्यावर होत असलेल्या महत्त्वपूर्ण परिणामांकडे लक्ष वेधले आहे. आरोग्यविषयक धोरणे आखताना आणि असंसर्गजन्य आजार प्रतिबंधासाठी कार्यक्रम आखताना हवेच्या दर्जाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- पल्लवी पंत, जागतिक आरोग्य विभागप्रमुख, ‘एचईआय’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.