Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चीनमध्ये आर्थिक अस्थिरता, श्रीमंत उद्योजकांनी देशाला ठोकला रामराम! शत्रू देशात केला मुक्काम

10

China Economy : जवळपास जगाच्या आर्थिक बाजारात आपला दबदबा ठेवणारे चीन सध्या आर्थिक अडचणीच्या कात्रीत अडकल्याचे चित्र दिसतंय. पुढच्या वर्षी जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था थोडी घसरलेली दिसेल यामध्ये अमेरिका आणि चीन सारख्या महासत्ताक देशांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. येणाऱ्या काळात चीनची परिस्थिती काहीसी ढासळलेली दिसेल असे फिच यांनी वर्तवले आहे. फिच अमेरिका स्थित कॅपिटल मार्केट कंपनी आहे.

फिचच्या आकड्यांनुसार पुढील वर्षी भारताचा जीडीपी वाढीचा अंद ७ टक्क्यावरून ७.५ पर्यंत वाढेल, पण २०२५ मध्ये जागतिक विकास दर २.४ टक्क्यापर्यंत घसरेल आणि असे फिचने अहवालात नमूद केलंय. जागतिक स्तरावरील आर्थिक घट होण्यासाठी चीन आणि अमेरिका कारणीभूत असतील यासह स्थानिक श्रीमंतांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल असे सुद्धा सांगण्यात आले आहे. फिच रिपोर्टमध्ये दावा केलाय यंदा १५ हजार २०० श्रीमंत देश सोडतील तर मागील वर्षी १३ हजार ८०० श्रीमंतांनी चीनला टाटा बाय बाय केले होते.
India GDP Growth: सर्वात मोठी गुड न्यूज! भारताच्या अर्थव्यवस्थेवर सर्वाधिक भरवसा; चीनला मोठा धोबीपछाड, अमेरिका-युरोपला कोणी विचारेना

अब्जाधीशांचा मायदेशाला रामराम शत्रू देशांत केला मुक्काम

चीनमधील बहुसंख्याक श्रीमंतांनी चीनला सोडत अमेरिका, सिंगापुर आणि जपान या देशांना पसंती दिली त्यामागे कारणे अशी की जपान आणि अमेरिका दोन्ही देश तंत्रज्ञानाने किंवा आर्थिक दृष्टीने चीनइतकेच प्रगत आहेत. जपानमधील जीवनशैली अतिशय जगभरात नावाजलेली आहे त्यामुळे जपानला चिनी नागरिकांनी पसंती दिली. सिंगापुरमधील संस्कृती चीनसोबत मिळती जुळती असल्याने तेथे सुद्धा चिनी नागरिकांनी जाण्यास पहिली पंसती दर्शवली आहे.

चीनमध्ये आर्थिक परिस्थितीमुळे तणाव

चीनची अर्थव्यवस्था गेल्या काही काळापासून अस्थिरता दिसून येते अमेरिकेपाठोपाठ आता युरोपीय देशांसोबतही आर्थिक तणावाचा सामना चीनला करावा लागत आहे. सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही रिअल इस्टेट क्षेत्रात मरगळ दिसते. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेत मोठी पडझड होण्याची शक्यता वर्तवली जाते. देशाच्या जीडीपीमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा ३० टक्के आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात बँका कोलमडण्याचा धोका आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.