तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Heat Stroke Death: दिल्लीत मृत्यूचे तांडव; २४ तासांत उष्माघाताने १७ जणांचा मृत्यू

0 29

वृत्तसंस्था, नवी दिल्ली: येथील राम मनोहर लोहिया (आरएमएल), लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) आणि सफदरजंग या तीन रुग्णालयांत गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट आहे; मात्र गुरुवारी सकाळी झालेल्या हलक्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

सफदरजंग रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेमुळे त्रस्त ३३ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. ‘एलएनजेपी’ या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १७पैकी पाच रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. तर, ‘आरएमएल’ रुग्णालयात गेल्या २४ तासांत उष्माघाताचे २२ रुग्ण आले; त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

‘शहरातील मुख्य स्मशानभूमी असलेल्या निगमबोध घाट येथे बुधवारी १४२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. ही संख्या सरासरीपेक्षा १३६ टक्के जास्त आहे. येथे दररोज सुमारे ५०-६० मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आणले जातात. मंगळवारी येथे ९७ मृतदेह आणण्यात आले होते’, असे स्मशानभूमीतील कामकाजाचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘निगमबोध घाट संचलन समिती’च्या सरचिटणीस सुमन गुप्ता यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.