
Tej Police Times
प्रेमी युगुलानं ट्रेनसमोर उडी मारण्याआधी हात बांधले. त्यांचे मृतदेह मिठी मारलेल्या अवस्थेत सापडले. आत्महत्या करण्याआधी त्यांनी हात स्कार्फनं बांधले होते. आयुष्याची अखेर करताना सोबत राहण्याच्या हेतूनं त्यांनी अशा पद्धतीनं हात बांधले असावेत. ट्रेनच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Rain Alert: राज्यासाठी पुढील ७२ तास महत्त्वाचे, मुंबई-पुण्यात मुसळधार, कोकणातही जोरदार सरी, हवामानाचा अंदाज
प्रेमी युगुल उत्तर प्रदेशच्या जलौन जिल्ह्यातील बारडोली गावाजवळ दोघांनी आत्महत्या केली. मनिष कुमार (२३) आणि दिक्षा गौतम (२०) अशी मृतांची नावं आहेत. दोघेही सुशील नगरचे रहिवासी आहेत. त्यांच्यात काका आणि पुतणी असं नात होतं. दिक्षा ही मनिषच्या भावाची लेक असल्यानं त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं व्हायचं.
मनिष आणि दिक्षा फोनवर लग्नाबद्दल बोलायचे. पण कुटुंबानं त्यांच्या नात्याला विरोध केला. मनिषनं दिक्षाला संध्याकाळी त्याच्या गावात आणलं. तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. पण समाज काय म्हणाले या भीतीनं कुटुंबानं त्यांच्या लग्नास ठाम विरोध केला. आपली विनंती अमान्य झाल्यानं दोघे निघून गेले.
Bhushi Dam : लग्नासाठी आग्य्राहून आले, पावसात भुशी डॅमचा मोह, वाहून गेलेल्या कुटुंबाचे शेवटचे क्षण कॅमेऱ्यात
दुसऱ्या दिवशी (२९ जून) पहाटे पाचच्या सुमारास दोघे रेल्वे रुळांवर गेले. त्यांनी ट्रेनसमोर उडी घेतली. त्यांच्या कुटुंबांना याबद्दल समजातच त्यांना धक्काच बसला. कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन्ही कुटुंबांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.