
Tej Police Times
भोले बाबा यांच्या सत्संगातील चेंगराचेंगरीमध्ये प्रशासनाचा बेजबाबदारपणा असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. सत्संग ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. सत्संग असलेल्या घटनास्थळी क्षमतेहून अधिक भक्त एकत्र जमले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भोले बाबा यांचं सत्संग संपल्यानंतर तिथून बाहेर पडण्यासाठी भक्तांनी घाई-गडबड केली. सत्संगातून बाहेर पडताना ही चेंगराचेंगरी झाली. हळूहळू परिस्थिती हाताबाहेर जात अत्यंत बिकट झाली आणि लोक एकमेकांवर पडत, एकमेकांखाली दबले गेले. यात अनेकांचा जीव गेला.
Who Is Bhole Baba: पोलीस दलातील नोकरी सोडून सत्संग करणारे भोले बाबा आहेत तरी कोण?हाथरस चेंगराचेंगरीत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू
तसंच महत्त्वाची बाब म्हणजे, सत्संगच्या घटनास्थळी चेंगराचेंगरी झाल्यानंतर पुढील बराच काळ कोणतंही बचावकार्य सुरू करण्यात आलं नव्हतं. मृतांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ही भीषण घटना घडल्याचा त्यांचा आरोप आहे. रात्रीपासून पोलिसांनी भाविकांना एका ठिकाणी थांबवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना एकत्र बाहेर काढलं आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली, अशीही माहिती प्रत्यक्षदर्शीकडून दिली जात आहे. भोले बाबा यांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा गर्दीच्या व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या आहेत.
Eknath Shinde : संयम सुटत असेल मात्र तो राखा, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचं आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
मिळालेल्या माहितीनुसार, सत्संग संपल्यानंतर भोले बाबा उर्फ साकार हरी बाहेर पडले. त्यांच्या गाडीमागे जात भक्तांनी धावाधाव सुरू केली. साकार हरी यांच्या भेटीसाठी भक्त एकाच वेळी त्यांच्या गाडीमागे जाऊ लागले, त्यामुळेही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळत आहे. मर्यादित लोकांसाठी परवानगी असताना क्षमतेपेक्षा अधिक संख्येने लोक सहभागी झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
भोले बाबा यांचं खरं नाव नारायण साकार हरी असं आहे. ते सत्संग करण्याआधी सरकारी नोकरी करत होते. पोलीस खात्यातील गुप्तचर विभागातील नोकरी सोडून त्यांनी सत्संग करण्यास सुरुवात केली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.