तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Agniveer Scheme : ‘शहीद’ अग्निवीरांच्या कुटुंबाला मदत मिळत नाही? राहुल गांधी यांचा आरोप खरा की खोटा ?

0 30

नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या अग्निवीर धोरणाबाबत संसदेत सोमवार (१ जुलै) रोजी मोठा गदारोळ झाला. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून हा गोंधळ झाला. अध्यक्षांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर राहुल गांधी आपले मत मांडत होते. यादरम्यान अग्निवीर योजनेवर भाष्य करताना ते म्हणाले – ‘लँडमाइनच्या स्फोटात एका अग्निवीरचा जीव गेला, पण त्याला शहीद म्हटले जात नाही. मी त्यांना शहीद म्हणतो, पण भारत सरकार त्यांना शहीद म्हणत नाही. पीएम मोदी त्यांना शहीद नव्हे तर अग्निवीर म्हणतात. त्यांच्या कुटुंबाला पेन्शन मिळणार नाही. त्याला नुकसान भरपाई मिळणार नाही, अग्निवीरचा वापर करून फेकून दिले जाते.” असा आरोप केंद्र सरकारवर केला. यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींच्या या विधानाला तात्काळ विरोध दर्शवला. ते म्हणाले की, ”मला हे स्पष्ट करायचे आहे की युद्धादरम्यान किंवा सीमेच्या सुरक्षेदरम्यान आमचा सैनिक (अग्नवीर) शहीद झाला तर त्याच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची भरपाई दिली जाते.”

दरम्यान, आज बातमीत आपण जाणून घेणार आहोत की, एखादा अग्निवीर शहीद झाला तर त्याला नुकसान भरपाई मिळते की नाही आणि असेल तर किती मिळते?

अग्निवीराचा ऑन ड्युटी मृत्यू झाला तर किती पैसे मिळतात?

जर एखाद्या अग्निवीराचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ४८ लाख रुपयांचे विमा संरक्षण, ४४ लाख रुपये, उर्वरित चार वर्षांच्या सेवेसाठी पूर्ण वेतन आणि सेवा निधी मिळतो. याशिवाय सेवानिधी फंडात जमा केलेली रक्कम आणि अग्निवीर कॉर्पस फंडातील व्याजासह सरकारी मदत दिले जाते.
Akhilesh Yadav Parliamentary Speech : संविधान, सरकारी नोकऱ्या, EVM मशीन राहुल गांधींपाठोपाठ अखिलेश यादव कडाडले

अग्निवीर ड्युटीवर नसेल तर काय मिळणार?

याबाबत भारतीय लष्कराच्या वेबसाईटवर असे सांगण्यात आले आहे की, जर अग्निवीर ड्युटीवर असताना मरण पावला नाही तर त्याला ४८ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. आणि सेवा निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि अग्निवीरकडून व्याजासह सरकारी मदत मिळते.

ड्युटीवर असताना अपंगत्व आले तर काय होईल?

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा अग्निवीर अपंग झाला तर त्याला 100%, 75% किंवा 50% अपंगत्वाच्या पातळीनुसार 44 लाख रुपये, 25 लाख रुपये किंवा 15 लाख रुपये देण्यात येतील. अनुक्रमे तसेच,अपंग झाल्यानंतर नोकरीसाठी शिल्लक राहिलेल्या वेळेसाठी पूर्ण वेतन आणि सेवा निधी दिला जातो. याशिवाय सेवानिधी फंडात जमा केलेली रक्कम व्याज आणि सरकारी योगदानासह अग्निवीर कॉर्पस फंडातूनही दिली जाते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.