
Tej Police Times
1950-1960 पासूनच भारत-रशिया मैत्री संबंधांवर पाश्चात्य देशांमध्ये ईर्ष्या आहे. मात्र, तरी सुद्धा भारत सातत्याने पाश्चिमात्य देशांचा दबाव धुडकावून लावत आपले स्वतंत्र परराष्ट्र धोरण घेऊन पुढे जात आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली तेव्हा दोन्ही नेत्यांनी ‘रशिया आणि भारताची मैत्री अतूट आहे,’ असे म्हटले होते. भारत आणि रशियाच्या वाढत्या मैत्रीसंबंधांमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते.
रशिया-युक्रेनमधील युद्ध 24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झाले. सर्वप्रथम रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. या हल्ल्यामागे जमिनीचे दावे, राजकीय आणि लष्करी रणनीती या कारणांचा समावेश होता. परंतु रशिया-युक्रेन युद्धामध्ये भारताची भूमिका संतुलित राहिली आहे. युक्रेनसोबतच्या युद्धासाठी भारताने अद्यापही रशियाला जबाबदार धरलेले असून भारताने तटस्थता राखली आहे. तर दोन्ही देशांनी संवादातून तोडगा काढावा असा सल्ला भारताने दिलेला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.