Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Bhagavad Gita : ‘भगवद्‌गीते’नुसार या ३ परिस्थितींमध्ये अपमान सहन केला, तर आयुष्यात बनाल सर्वोत्तम !

11

Bhagavada Gita Quotes : भगवद्‌गीतेतील ज्ञानाने प्रत्येक व्यक्तीचे जीवन सर्वोत्तम बनवले आहे. आपल्यातील उणिवांवर विजय मिळवण्याचे शिक्षण गीतेतून मिळते. गीतेनुसार तुम्हाला जर कोणी अपमानित करत असेल तर संयम आणि क्षमा भावनेने त्याचा सामना केला पाहिजे.

गीतेत कोठेही आत्मसन्मानाला त्रास देत अपमान सहन करणे शिकवलेले नाही, पण काही ठिकाणी अपमान सहन करणे तुमच्यासाठी यशाची शिडी कसे ठरू शकते, हे सांगितले आहे. श्रीकृष्ण सांगतात, ‘या तीन परिस्थितींमध्ये अपमान सहन करणे तुम्हाला एक चांगला माणूस बनवू शकते.’ जाणून घेऊ या तीन परिस्थितीत कोणत्या आहेत.

आईवडिलांनी केलेला अपमान

बऱ्याच वेळा आईवडील रागाच्या भरात आपला अपमान करतात. मुलाने अधिक कार्यतत्पर बनवण्यासाठी ते अपमानास्पद बोलतात. भगवद्‌गीतेनुसार व्यक्तीने आईवडिलांनी केलेला अपमान सहजरीत्या सहन केला पाहिजे, कारण हा अपमान कधीही तुमच्या आत्मसन्मानाला इजा पोहोचवण्यासाठी नसतो, तर तो तुम्हाला परिस्थितीशी लढालया शिकवण्यासाठी असतो. आईवडिलांनी केलेले अपमान तुम्हाला जीवनातील परिस्थितीसी लढायला शिकवतो. बरेच लोक आईवडिलांनी केलेला अपमान मनाला लावून घेतात आणि त्यांच्याशी क्रोधित होतात, पण असे करणे आपल्या शोभत नाही, ते चुकीचे आहे.

शिक्षकाने केलेला अपमान

<strong>शिक्षकाने केलेला अपमान</strong>

बऱ्याच वेळा शिक्षक किंवा गुरू क्रोधित होऊन तुम्हाला सुधारण्यासाठी तुमचा अपमान करतात. गुरू किंवा शिक्षकाने केलेला अपमान कोणतीही प्रतिक्रिया न देता सहन केला पाहिजे आणि त्यांना उलट उत्तर देऊ नये. शास्त्रात सांगितले आहे की,’आईवडील किंवा गुरू यांचे कटू बोल जीवनातील सत्य आणि कठीण परिस्थितीची जाणीव करून देतात. या दोघानांचेही जीवनात मार्गदर्शन आणि भविष्य घडवण्यात मोठे योगदान असते. त्यामुळे त्याचे बोलणे कधीही अपमान म्हणून घेऊ नये, उलट त्यात स्नेह शोधण्याचा प्रयत्न करावा.’

परमेश्वराच्या स्थानी झालेला अपमान

<strong>परमेश्वराच्या स्थानी झालेला अपमान</strong>

मंदिरात जर तुमचा अपमान झाला तर क्लेश किंवा वादविवाद न करता संयमाने त्याला हाताळले पाहिजे. भगवद्‌गीतेनुसार देवस्थानी अपमान सहन करणारे आणि वादविवाद न करणाऱ्यांना देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. येथे झालेला अपमान हा स्वतःवर झालेला हल्ला न समजता परमेश्वर आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे असे समजावे. जो तुमचा अपमान करत आहे, त्याला मंदिरात येण्याचे प्रयोजन समजलेले नाही आणि मंदिरातील शांतीला तो स्वतःच्या जीवनात स्थान देऊ शकत नाही, पण तुम्हाला या पवित्र ठिकाणाचा सन्मान केला पाहिजे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.