तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Indian Railway: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! वेटिंग तिकिटाचा नियम बदलला; वेळीच जाणून घ्या, अन्यथा पडेल महागात

0 56

Indian Railway Waiting ticket: प्रवाशांनो, तुम्ही वेटिंग तिकीटने आरक्षित डब्ब्यात प्रवास करताय? वेळीच सावध व्हा! कारण भारतीय रेल्वेने प्रवासाचे नियम आणखी कठोर करण्याचे ठरवले आहे. यामुळे तुमच्या यात्रेतील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासन १ जुलैपासून वेटिंग तिकीटवर प्रवास करण्याच्या बाबतीत नियम कठोर करणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार कोणीही हा नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला चालू प्रवासामध्येच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. टिकीट चेकींग करणाऱ्यांना तसे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, वेटिंग तिकीटवर रेल्वेच्या आरक्षित डब्ब्यांमध्ये प्रवास करण्यास रोख लावला जाणार आहे. तुम्ही तिकीट ऑफलाईन पद्धतीने जरी काढले असेल तरी तुम्हाला आरक्षित डब्ब्यात प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्ब्यांमध्ये कन्फर्म तिकीटने प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. तरी वेटिंग तिकीटवर प्रवास करणाऱ्यांना हा मोठा फटका असणार आहे.
२०५० पर्यंत १० देशांमध्ये सुसाट वेगानं वाढणार मुस्लिम लोकसंख्या; भारताचा नंबर कितवा?

रेल्वे अधिकारी सांगतात,

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेटिंग तिकीटांवर प्रवास करण्यावर बंदी आजच लागू होत नाही तर ती ब्रिटिश काळापासूनच लागू आहे. परंतु त्याचे काटेकोरपणे पालन केले गेले नाही. रेल्वेचा स्पष्ट नियम आहे की, जर तुम्ही तिकीट खिडकीतून तिकीट घेतले असेल आणि ते वेटिंग वर असेल तर तुम्ही ते रद्द करून पैसे परत मिळवू शकता, मात्र असे करण्याऐवजी प्रवासी डब्यात चढून सर्रास प्रवास करतात. यावर रोख लागणे गरजेचे आहे. परंतु, प्रवाशांच्या सोयीचा विचार करून सध्या फारसे कठोर नियम बनवले नाहीत.
SpiceJet Airlines च्या कर्मचारी महिलेने CISF जवानाच्या कानशिलात लगावली, धक्कादायक कारण समोर, पाहा व्हडिओ

वेटिंग तिकीटने प्रवास केल्यास पडेल महागात

यापुढे जर वेटिंग तिकीट असलेला प्रवासी आरक्षित डब्ब्यातून प्रवास करताना आढळला, तर त्याला ४४० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो आणि त्याला चालू प्रवासातच बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. याशिवायन अशा प्रवाशांना सामान्य डब्ब्यात हलवण्याचा अधिकारही टीटीला असणार आहे. रेल्वेकडे सुमारे हजारों प्रवाशांच्या तक्रारी वर्ग झाल्या आहेत. आरक्षित डब्ब्यातील प्रवाशांकडून आपली गैरसोय होत असल्याच्या या तक्रारी आहेत. त्यामुळे आरक्षित डब्ब्यातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन नियम कठोर करण्याच्या तयारीत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.