Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mobile Tower Radiation: मोबाईल टॉवर रेडिएशनचा गर्भवती महिलांवर परिणाम होतो का? सरकारने सांगितले सत्य

9

Mobile Radiation Impact: मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनचा गर्भवती महिलांवर परिणाम होतो का? सरकारी समितीने या प्रश्नाला उत्तर दिले असून मोबाईल टॉवरमधून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMF) रेडिएशन सध्याच्या मर्यादेपेक्षा दहा पटीने वाढवण्याची शिफारसही केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
दूरसंचार विभाग आणि आरोग्य मंत्रालयाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या एका सरकारी समितीने मोबाइल टॉवरमधून उत्सर्जित होणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMF) रेडिएशन सध्याच्या मर्यादेच्या दहा पटीने वाढवण्याची शिफारस केली आहे. हे नॉन-आयोनायझिंग रेडिएशन प्रोटेक्शन (ICNIRP) वरील आंतरराष्ट्रीय आयोगाच्या 2020 च्या नियमांचे पालन करण्यासाठी केले जात आहे. देशातील नेटवर्क कव्हरेज सुधारण्यासाठी आणि अधिक टॉवर्स बसवण्याची गरज कमी करण्याच्या प्रयत्नात ही शिफारस करण्यात आली आहे. दूरसंचार उद्योग लॉबिंग संस्था COAI ने देखील अशीच मागणी केली होती. अशावेळी अतिरिक्त किरणोत्सर्गाचा परिणाम मुलांवर, गर्भवती महिलांवर किंवा प्राण्यांवर होईल का, असा प्रश्न निर्माण होतो. त्यावर सरकारी पॅनलनेही प्रतिक्रिया दिली आहे.

मोबाईल रेडिएशनचा गर्भवती महिलांवर परिणाम होतो का?

सरकारी पॅनेल म्हणते की मोबाइल टॉवरमधून रेडिएशन मर्यादा 10 पट वाढवून देखील लोक, मुले, गर्भवती महिला किंवा प्राण्यांना कोणतेही नुकसान होणार नाही. यामुळे मोबाईल नेटवर्क सुधारेल आणि आणखी टॉवर्स बसवण्याची गरज भासणार नाही. पण, यामुळे लोकांचा संशय वाढू शकतो, असा इशाराही पॅनेलने दिला आहे. सरकारी समितीने आपल्या अहवालात मोबाइल टॉवरमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनचे (EMF) प्रमाण १० पटीने वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

सरकारला करायची आहे लोकांची चिंता कमी

टॉवर्समधून उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गाचे प्रमाण खूपच कमी असावे असा कायदा भारतात आधीच आहे. हे प्रमाण ICNIRP पातळीपेक्षा 10 पट कमी आहे. पण एवढ्या कमी रेडिएशनमुळे फोनचे नेटवर्क नीट काम करणार नाही आणि त्यांना आणखी टॉवर लावावे लागतील, असे मोबाइल कंपन्यांचे म्हणणे आहे. तथापि, काही लोकांना असे वाटते की मोबाईल टॉवरमधील किरणोत्सर्ग हा आरोग्यास धोका आहे. सरकारला लोकांची ही चिंता कमी करायची आहे. त्यामुळेच सरकारला कमी खर्चात मोबाईल टॉवर्स तपासायचे आहेत.

चिंतेमुळे अनेक मोबाईल टॉवर काढले

COAL चे महासंचालक (निवृत्त) लेफ्टनंट जनरल एसपी कोचर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, दूरसंचार टॉवर्समधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा मुद्दा कितीही कमी असला तरीही नेहमीच संवेदनशील राहिला आहे. टॉवर उभारण्याच्या विरोधात अनेक भागातील लोकांनी व दबावगटांनी न्यायालयात खटले दाखल केले आहेत. अशी अनेक प्रकरणे देशभरात उघडकीस आली आहेत, जिथे कंपन्यांना लोकांच्या याचिका किंवा निषेधामुळे टॉवर हटवावे लागले आहेत.

या देशांमध्ये ICNIRP नियम लागू आहेत

मोबाईल टॉवरमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ लहरी (EMF) बाबतचे नियम बदलले नाहीत, तर भारतातील 5G चा वेग आणि गुणवत्तेवर परिणाम होईल. सीओएआयचे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एसपी कोचर म्हणतात की यामुळे नेटचा वेग कमी होईल, नेटवर्क खराब होईल आणि सिग्नल देखील कमकुवत राहतील. ते म्हणतात की इंग्लंड, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, इजिप्त, युगांडा आणि सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये ICNIRP नियम आधीपासूनच लागू आहेत. सीओएआयने यासंदर्भात दूरसंचार सचिव नीरज मित्तल यांनाही प्रस्ताव पाठवला आहे.

नंदिता रामेश्वर थोरात

लेखकाबद्दलनंदिता रामेश्वर थोरातनंदिता थोरात हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझममध्ये मास्टर्स केले आहे. तिला पब्लिक रिलेशन्स, न्युज रायटिंग, फीचर रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग आदी मीडिया संबंधित कामांचा जवळपास १० वर्षांचा अनुभव आहे. जनरल फीचर्स, फायनान्स फीचर्स नंतर ती आता टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. कामाव्यतिरिक्त तिला वाचनाची विशेष आवड असून हिंदी सिनेमा बघणे तसेच त्यावर समीक्षण नोंदवणेही आवडते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.