Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Swapna Shastra: सकाळची स्वप्न खरी होतात का? वाईट स्वप्न का पडतात? जाणून घ्या

23

Swapna Shastra In Marathi :

स्वप्नं रहस्यमय आणि रोमांचक असतात. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आणि धार्मिक परंपरांत स्वप्नांना महत्त्व दिलेले आहे आणि त्यांचे संकेत समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदू धर्मातील स्वप्न शास्त्रात स्वप्नांना आणि त्याच्याशी संबंधित रहस्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सर्वसाधारण असे मानले जाते की, स्वप्नं हे संकेत असतात आणि कोणत्या तरी बाबतीत आपल्याला सावध करत असतात.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर स्वप्नांना अंतर्मनात दडलेले विचार, इच्छा, भीती आणि इतर भावनांशी जोडलेले आहे. विज्ञानान असे मानते की, स्वप्न तेच दाखवतात जे आपल्या अंतर्मनात लपलेले असते. अंतर्मनात तुमच्या जीवनात काय सुरू आहे, आणि तुम्ही ते समजून घेत नाहीत, ते सांगत असते. म्हणजे न सुटलेले मुद्दे अंतर्मन दाखवत असते. म्हणून स्वप्नं तुमच्या वास्तविक जीवनाशी जोडलेली असतात आणि आपल्याला संकेतसारखी दिसतात. तुमच्या जीवनात ज्या बदलाची किंवा स्वीकृतीची गरज आहे, त्याच गोष्टी अंतर्मन स्वप्नाच्या रूपात दाखवत असते. काही वेळा भावना इतक्या खोलवर असतात की स्वप्न वास्तविक वाटू लागतात.

1. सकाळची स्वप्न का खास असतात?

बरेच लोक सकाळचे स्वप्न अगदी खास मानतात. याच्या मागे एक शास्त्र आहे. सकाळी तुम्ही झोपेच्या शेवटच्या टप्प्यात असता, त्यामुळे सकाळची स्वप्न जास्त सुस्पष्ट आणि लक्षात राहाणारी असतात, त्यामुळे तुम्हाला ती खास वाटतात. ज्या अर्थी हे स्वप्न तुम्हाला नीट लक्षात आहे, तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात पूर्ण होणार असे तुम्हाला वाटते. वैज्ञानिकांचे म्हणणे असे असते की स्वप्न कोणत्याही वेळी पाहा, ती खरी होत नाहीत, पण तुमच्यासाठी तो अंतर्मनाचा एक संकेत असतो, जे तुम्ही तुमच्या मनात खोलवर लपवून ठेवला आहे, आणि त्याला समोर आणण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला स्वप्नांकडे आवश्य लक्ष दिले पाहिजे कारण तुम्ही जर त्यांना समजू शकला नाही, तर तुम्ही बऱ्याच भावनांकडे दुलर्क्ष करत असता.

2. स्वप्न खरी होतात का?

धार्मिक दृष्टिकोनातून आणि स्वप्न शास्त्रांचा विचार केला तर सकाळी पाहिलेली स्वप्न बऱ्याच वेळा सत्यात उतरतात. याचे कारण असे आहे की, ब्रह्म मुहूर्त ही देवतांची वेळ मानली जाते, या वेळी ऊर्जा शुभ आणि प्रबळ असते. या वेळेत जी इच्छा पूर्ण शक्तीने केली जाते, ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते. स्वप्न शास्त्रानुसार सकाळी ३ ते ६ या वेळेत जे स्वप्न पाहाता, त्याची फलप्राप्ती सहसा ६ महिन्यांत मिळताना दिसते.

जर तुम्ही सायंकाळी झोपत असाल तर ६ ते १० वाजेपर्यंत आलेलं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ५० टक्के असते. तर १२ वाजता एखादे स्वप्न पाहात असला तर ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ८० टक्के असते. जर तुम्ही ९ ते १० या वेळेत झोपत असाल आणि १० ते १२ वाजात एखादे स्वप्न पाहिले तर ते पूर्ण होण्याची शक्यता नसते, कारण तुम्ही दिवसभर जो विचार करता, त्याच्याशी हे स्वप्न संबंधित असते. दुपारच्या वेळी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता ही नसते.

3. वाईट स्वप्न केव्हा येतात, आणि आपले स्वप्न इतरांना सांगावे की नाही?

शास्त्रांनुसार तुमच्या कुंडलीत जेव्हा राहू, केतू आणि शनी यांचा प्रभाव जास्त असतो तेव्हा तुम्हाल भीतीदायक स्वप्न पडू शकतात. अशा स्थितीत खराब स्वप्न येऊ नयेत, यासाठी या ग्रहांची शांती करावी लागते. जर या ग्रहांची स्थिती कुंडलीला अनुकूल असेल तर तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडणार नाहीत. असेही सांगितले जाते की स्वप्नांमुळे शुभफल प्राप्ती होणार असेल, तर ते स्वप्न कोणालाही सांगू नये. तर दुसरीकडे स्वप्नांमुळे अशुभ फल प्राप्ती होणार असेल तर, ते कोणाला तरी सांगावे, त्यामुळे वाईट होण्याची शक्यता टळते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.