तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

उद्धव ठाकरेंना बजेट कळतच नाही, ते बजेटवर का बोलतात? : नारायण राणे

0 41

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र नाही असे उद्धव ठाकरे म्हणतात. उद्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये वांद्र्याचे कलानगर दिसत नाही असेही म्हणतील, अशा शब्दांत भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव अशी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.

ठाकरेंना बजेट कळतच नाही

उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले पाहिजे. मोदींनी महाराष्ट्राची लूट केली, दिल्लीचे बुट चाटणारे सरकार असे ठाकरे बोलले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पात काय दिवे लावले याची माहिती माझ्याकडे आहे. वास्तविक ठाकरेंना बजेट कळतच नाही, त्यामुळे त्यांनी बजेटवर बोलू नये. आमचा अर्थसंकल्प सर्वंकष आहे असे नारायण राणे म्हणाले. देशाच्या बजेटमध्ये महाराष्ट्र नाही म्हणतात. उद्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये कलानगर दिसत नाही म्हणतील असा टोलाही त्यांनी लगावला. अर्थव्यवस्थेमध्ये भारताला दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पुढे आणण्यात आल्याचेही राणे यावेळी म्हणाले.
Uddhav Thackeray : दिल्लीचे बूट चाटणाऱ्या घटनाबाह्य सरकारला किंमत मोजावी लागणार, ठाकरेंची तोफ

उद्धव ठाकरे भावीच राहणार

नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे फलक लागले असू त्यावरून राणे यांनी खोचक शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या इच्छा पूर्ण होवोत. देव तुम्हाला चांगले बोलण्याची बुद्धी देवो. मात्र भावीला काही अर्थ नसतो. भावी हा भावीच राहतो. उद्धव ठाकरेच्या पक्षाला गळती लागली आहे असेही राणे म्हणाले.

पण नंतर राज ठाकरे यांच्या आकड्यांत बदल होईल….

यावेळी नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही उत्तर दिले. राज ठाकरे निवडणूक लढत आहेत. ते २०० पेक्षा जास्त जागा लढवणार आहेत. निवडणुका जाहीर होण्यापर्यंत ते त्यांचे आकडे सांगतील. पण नंतर त्यात सर्व बदल होईल. जागांचे आकडे वाढतील, कमी होतील वा समझौता होईल. असा बराच काही बदल होऊ शकतो असेही राणे म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.