Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुन्हा हिट अँड रन; नवी मुंबईत चालत्या रिक्षाला उडवलं, थरारक CCTV समोर; ऑटोचालकाचा मृत्यू

8

नवी मुंबई : राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. पुणे कल्याणीनगर, मुंबई वरळी या घटनानंतर आता नवी मुंबई शहरातील वाशी सेक्टर ९मध्ये अशीच एक हिट अँड रनची घटना घडली आहे. दुपारच्या वेळी साईनाथ स्कूलसमोर एका निळ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या चालकाने दोन कार आणि एका ऑटोला जोरदार धडक देत पळ काढला आहे. या भीषण अपघातामध्ये ऑटो चालकाचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात मध्ये कैद झाली असून सध्या इनोव्हा कार पोलिसांच्या ताब्यात आहे. घडलेल्या भीषण अपघाताबाबत वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

तरुणाने आयुष्य संपवलं

सागरी पुलांवरुन अनेकांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रत्नागिरी शहराजवळील भाट्ये पुलावरुन एका वकीलाने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबई – नवी मुंबई जोडणाऱ्या अटल सेतूवरुनही एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. करुतुरी श्रीनिवास असं या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. तो खासगी नोकरीस असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Navi Mumbai: १४ वर्षांनी घरात पाळणा हलला, पण… रुग्णालयाचा बिलासाठी तगादा अन् जुळ्या लेकरांच्या बापाचं टोकाचं पाऊल

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरुन प्रवास करताना नयनरम्य दृश्य प्रवाशांचं लक्ष वेधून घेतं. असं असतानाच आता हा पूल वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. पर्यटक आणि प्रवासासाठी महत्त्वाचा ठरलेल्या या पुलाचा उपयोग काही जण आपलं जीवन संपवण्यासाठी करत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. मार्च महिन्यात ४३ वर्षीय डॉक्टर महिला किंजल शाहने अटल सेतूवरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली होती. लाख प्रयत्न करुनही किंजल शाहची बॉडी शोधण्यात शोध पथकाला अपयश आलं होतं. आता अशीच एक घटना पुन्हा अटल सेतूवर घडली आहे.

एका व्यक्तीने अटल सेतूवरुन खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात उडी मारल्याचं समोर आलं आहे. नवी मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यातच आता या व्यक्तीने उडी मारल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवार २४ जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. करुतुरी श्रीनिवास असं या व्यक्तीचं नाव आहे. मुंबईकडून सुमारे साडे तेरा किलोमीटरच्या अंतरावर अटल सेतूवरुन जाताना त्याने त्याची टाटा नेक्सॉन कार क्रमांक MH 05 EV 0849 त्याने अटल सेतूवरच थांबवली. तो कारमधून खाली उतरला. त्याने कोणताही विचार न करता, आजूबाजूला कुठेही न पाहता अटल सेतूच्या कठड्यावर चढून थेट समुद्रात उडी मारली. खवळलेल्या पाण्यात स्वतःला झोकून दिलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.