Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sharad Pawar: शरद पवारांच्या वक्तव्याचा जो अर्थ घ्यायचा तो घेतला गेला; एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून असे विचार…: शिरसाटांचा निशाणा

9

म. टा. विशेष प्रतिनिधी

शरद पवार यांच्या वक्तव्याचा जो अर्थ घ्यायचा तो घेतला गेला असून पवार यांनी केलेले वक्तव्य हे महाराष्ट्राचे मणिपूर होईल अशा स्वरुपाचे आहे. दोन समाजातील निर्माण झालेल्या तेढीबाबत त्यांनी, असे वक्तव्य केले आहे. मात्र राज्यात जातीय दंगली पेटणार असल्याचे भाकीत करणे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगले नाही. एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून असे विचार निघाले तर राज्यात येणारी गुंतवणूक थांबते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सोमवारी दिली. पूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीने जातीजातीत भांडणे लावून आपले राजकारण केल्याची टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाराष्ट्रातही काही तरी घडेल, अशी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व राजकीय पक्षांना बोलवून मराठा आरक्षणाबाबत बैठक घेतली. ठाकरे गटाच्या नेत्यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसच्या नेत्यांनेही भूमिका स्पष्ट केली नाही. शरद पवार यांनी आरक्षणाबाबत गोलमोल भूमिका घेतली आहे. आरक्षणाला सरकार जबाबदार आहे. सरकारला फासावर लटकवले पाहिजे, अशा पद्धतीने राजकारण केले जाते. शरद पवार यांनी काल त्यांच्या मनातील मणिपूर बोलून दाखवला आहे. एकीकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनातून बोलायचे, हाकेच्या आंदोलनाला फुस लावायची, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी टीका केली.
Manu Bhaker Net Worth: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक जिंकून देणाऱ्या मनू भाकरची एकूण संपत्ती इतके कोटी!

शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर कधीच भूमिका जाहीर केली नाही. गेल्या ४० वर्षांपासून मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने त्याची कधी दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा समाज व्यथित झाला होता. ४० वर्षानंतर शिंदे सरकार आल्यानंतर त्याची नक्कल घ्यायला सुरुवात झाली, याचा परिणाम म्हणून जुन्या कुणबी नोंदी सापडल्या. सरकार काही करत नाही असे म्हणणाऱ्यांना कावीळ झाली आहे असेही ते म्हणाले.

यावेळी शिरसाट यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपांवरही टीका केली. कायदेशीर प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक झाली होती. त्या प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप नव्हता. सरकारला सुडाचे राजकारण करायचे असते तर अनिल देशमुख आज जेलमध्ये असते. अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एवढ्या दिवसांनी अशा स्वरुपाचे आरोप करणे हा ढोंगीपणा आहे, अशी टीकाही शिरसाट यांनी केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.