तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

उद्धवजी आणि देवेंद्रजी यांच्यातील वाद मिटला नाहीतर…; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

0 47

पुणे : ‘उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधील वाद मिटला नाही, तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेन’, असं वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आठवले हे पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ३१ जुलै रोजी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी हे भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील रंगशारदामध्ये शिवसैनिकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘एकतर तू राहशील नाहीतर मी राहील’, असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर भाजपचे दिग्गज नेते शिवसेनेवर चांगलेच बरसले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते सुधीर मुनटीगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तर भाजपकडून व्हिडिओ पोस्ट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं. या व्हिडिओला भाजपने ‘उद्धव ठाकरे फक्त एवढं लक्षात ठेवा…’, असं कॅप्शन दिलं होतं. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ‘माझा एक सिद्धांत पक्का आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी नादी लागलं तर सोडत नाही’.
Jitendra Awhad: संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका, जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मुंबईत हल्ला

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले…

‘अनेक जण म्हणाले, उद्धवजी तुम्ही देशाला दिशा दाखवली. मी म्हणालो आपण जोपर्यंत सरळ होतो. तेव्हा सरळ एकदा वाकड्यात घुसलो तेव्हा आपण वाकड करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे. राजकारणतली षंड माणसं आहेत. आपण असा लढलो की मोदींना सुद्धा घाम फुटला. मोदीचं भाषण ऐकताना कीव येतेय. मी नगरसेवक कधी झालो नाही थेट मुख्यमंत्री झालो, जे शक्य होतं ते मी सगळं केलं. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी पक्ष कुटुंब सगळं फोडलं. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत’, असंही ठाकरे म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.