
Tej Police Times
घडलेल्या घटना लक्षात येताच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कॉल केला. ‘राज्यात युती सरकार आहे आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाला एकट्या मलाच नव्हे, तर उद्योग मंत्र्यांनाही वगळण्यात आलंय,’ असं अजित पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले. यावर शिंदेंनी आश्चर्य व्यक्त केलं. तुम्ही सह्याद्रीला या. तोपर्यंत कार्यक्रम संपणार नाही याची काळजी मी घेतो, अशा शब्दांत शिंदेंनी पवारांची समजूत काढली. यानंतर पवार आमि सामंत बैठक सोडून सह्याद्रीला रवाना झाले. यामुळे महायुतीत असलेला विसंवाद दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.