
Tej Police Times
कम्प्युटर सायन्समध्ये एमएससी पार्ट-१ करणाऱ्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या सत्राची परीक्षा जून २०२३मध्ये झाली होती. या परीक्षेचा निकाल डिसेंबर २०२३मध्ये लावण्यात आला. या बॅचच्या ४३ पैकी २९ ते ३० विद्यार्थ्यांनी या सत्रातील आपले पेपर पुनर्मूल्यांकनासाठी दिले होते. मात्र पुनर्मूल्यांकनाचे निर्णय जाहीर होण्याआधीच होण्याआधीच मार्च २०२४ मध्ये या विषयाची एटीकेटीची परीक्षा घेत जुलै २०२४ मध्ये या परीक्षांचा निकालही जाहीर झाला.
आणखी एका प्रकरणात यंदा एमएससी पार्ट-२च्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा फेब्रुवारीमध्ये पार पडल्या आणि निकाल जुलैमध्ये जाहीर झाला. हा निकाल लावताना आदर्श उत्तरपत्रिका न काढता मूल्यांकन करणे, अनेक प्रश्न न तपासता कम्प्युटरद्वारे त्यावर आडवी खूण करणे, अनेक उत्तरे न तपासता ती गाळून टाकणे आदी अनियमितता असल्याचा ठपका विद्यार्थ्यांनी ठेवला. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांवरील काही पानांवर तशी फुली असल्याचेही स्पष्ट दिसते. कम्प्युटराइज्ड प्रणाली विकसित होऊनही समजा ही परिस्थिती असेल, तर आम्ही जाब कोणाला विचारायचा, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने गोपनीयतेच्या अटीवर व्यक्त केली.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदाळे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी, या सर्व त्रुटींवर तोडगा काढण्याचे काम जोमाने सुरू असल्याचे सांगितले. कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सखोल चौकशी झाली आहे. या उत्तरपत्रिका प्रत्यक्षात परीक्षकांच्या हाती पडत नाहीत. त्यांची सॉफ्ट कॉपी दिली जाते. त्या ओएसएम नावाच्या प्रणालीत टाकून तपासल्या जातात. या प्रणालीतून काही रेषा उमटल्या असण्याची शक्यता आहे, असेही त्या म्हणाल्या.
CTET Result 2024: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर, ३ लाख ६६ हजारांहून अधिक उमेदवार उत्तीर्ण
‘तोडगा काढण्याचे काम सुरू’
कोणतीही नवी प्रणाली लागू केली की, ती व्यवस्थेत रुळायला वेळ लागतो. विद्यार्थ्यांना परीक्षा भवनापर्यंत यायलाच लागू नये, असा आमचा प्रयत्न आहे. गुणपत्रिका मिळणे हा विद्यार्थ्यांचा मुलभूत हक्क आहे. त्यासाठी त्यांना खेटे घालायला लागणे, ही चांगली बाब नाही, हे आम्हालाही समजते. त्यावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे आणि लवकरच विद्यार्थ्यांना परीक्षा भवनापर्यंत यावे लागू नये, अशी यंत्रणा आम्ही उभी करू, असे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदाळे यांनी सांगितले.
विद्यार्थिनी द्विधा मनस्थितीत
अनुजा नावाच्या विद्यार्थिनीने जून २०२३मध्ये मराठी वाड़्मय विषयाची एमएची परीक्षा दिली होती. जुलै २०२४ उलटून गेला, तरीही तिला गुणपत्रिका मिळालेली नाही. याबाबत तिने विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. तिला विद्यापीठातील आणखी एका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. मात्र विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे ती प्रवेशाबाबत द्विधा मनस्थितीत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.