तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

रक्षाबंधनच्या तोंडावर तरुणीचं टोकाचं पाऊल, दोन भावांची लाडाची बहीण गेली, जळगाव हळहळलं

0 43

निलेश पाटील, जळगाव: जळगावात एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. येथे एका १८ वर्षांच्या विद्यार्थिनीने आपलं आयुष्य संपवलं आहे. घरी कुणीही नसताना तिने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. घरात एकटी असताना एका अठरा वर्षीय विद्यार्थिनीने आजाराला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. जेव्हा कुटुंबातील सदस्य घरी आले तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. जेव्हा कुटुंबीयांनी विद्यार्थिनी गळफास घेतलेला अवस्थेत दिसताच मोठा आक्रोश केला.

आजाराला कंटाळून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती

अश्विनी प्रकाश पाटील (वय १८) राहणार कासमवाडी या विद्यार्थिनीने आजाराला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी (३ ऑगस्ट २०२४) उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अश्विनीने घरात कोणीही नसताना हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
Kedarnath Cloudburst: केदारनाथमध्ये ढगफुटी, महाराष्ट्रातील १२० भाविक अडकले, बचावकार्य सुरु

घरात कोणीही नसताना उचललं टोकाचं पाऊल

अश्विनी पाटील ही विद्यार्थिनी कासमवाडी परिसरात आई-वडील आणि दोन भावांसह राहत होती. अश्विनीचे वडील प्रकाश पाटील हे खाजगी वाहनावर चालक आहेत. काही दिवसांपासून ती आजारी होती, त्यामुळे आजारपणामुळे ती खूप तणावात होती. शनिवारी घरी कोणी नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीय घरी आल्यानंतर लक्षात येतात त्यांनी अश्विनीला जीएमसीत दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रक्षाबंधनच्या काही दिवसांपूर्वीच बहिणीने जीव दिला

अश्विनी ही दोन भावांची एकच लाडकी बहीण होती दोघे भाऊ आणि बहीण घरामध्ये सर्वांशी मनमिळाऊ पणे राहत होते. दोन भावांचा जीव लाडक्या बहिणीमध्ये होता. मात्र, बहिणीला आजार असल्याने तिने हा टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याने दोघं भावांनी ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर बहीण गमावली. त्यामुळे दोन्ही भावांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.