
Tej Police Times
शेतकऱ्यांसाठी योजना ठरणार वरदान …
अजित पवार पुढे म्हणाले, ‘नीरा-भीमा खोऱ्यात दर वर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडतो . पावसाळ्यात नीरा नदीमध्ये पाणी येथे हे पाणी वाहून जाते . ते पाणी कऱ्हा नदीला आणून मिळविण्यासह मधल्या पट्ट्यातील तलाव भरून घेण्याची ही योजना आहे . बारामतीच्या दुष्काळी पट्ट्यातील माझ्या शेतकऱ्यांना ही योजना वरदान ठरेल. लवकरच या योजनेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ’
विरोधकांबाबत काय म्हणाले अजित पवार?
‘महायुतीच्या योजनांवर विरोधक ‘चुनावी जुमला’ म्हणून टीका करत आहेत. अनेक विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत . आम्ही मात्र सुसंस्कृतपणे विकासाच्या मुद्द्यावर भूमिका मांडणार आहोत. कोणीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार नाही . आमच्याकडे विकासाच्या सांगण्यासारख्या योजना असल्याने त्यावरच बोलू,’ असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar: चुxx शब्द बोलता बोलता अजित पवार थांबले, शब्द फिरवला अन् म्हणाले…
‘योजना कायमस्वरूपी’
‘मी गेले दहा वर्षे अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहे. अडीच कोटी महिला डोळ्यांसमोर ठेवूनच लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे. यासाठी ४६ हजार कोटींची गरज लागणार आहे. अर्थात सरकारने याची तयारी केलेली आहे . ही योजना पुढे कायमस्वरूपी चालू ठेवायची असेल, तर महायुतीच्या उमेदवारासमोरील बटण दाबावे लागेल,’ असे अजित पवार म्हणाले . ‘अर्थात लोकशाही आहे, तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही मत देऊ शकता,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.