
Tej Police Times
गाडीमध्ये मौल्यवान वस्तू
‘चारचाकीचा दरवाजा बंद आहे, म्हणजे आतमधील मुद्देमाल सुरक्षित राहिली,’ अशा समजुतीतून अनेक नागरिक चारचाकीमध्ये किमती वस्तू, ‘सॅक’, ‘बॅग’ किंवा पिशवी ठेवतात. मात्र, चोरटे चारचाकीची काच फोडूनच चोऱ्या करीत आहेत. शहरात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे असूनही भरदिवसा चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना किमती मुद्देमालाची चोरी आणि चारचाकीचे नुकसान असा दुहेरी फटका बसत आहे.
आयुक्तालयाजवळ कार फोडल्या
पोलिस आयुक्तालयाजवळील हॉटेल ‘ब्लू नाइल’च्या विरुद्ध दिशेला रस्त्यावर पार्किंग केलेल्या चारचाकीची काच फोडून ३६ हजार रुपयांची रोकड व चांदीचे पैंजण चोरून नेले आहेत. ही घटना तीन ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणात ४८ वर्षीय व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वाघोली येथील रहिवासी आहेत. ते कामानिमित्त शहरात आले होते. त्यावेळी हॉटेल ब्लु नाइलच्या विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर त्यांनी चारचाकी लावली होती. त्या वेळी कारच्या मागील सीटवर ठेवलेली पर्स काच फोडून चोरून नेली. दरम्यान, या पूर्वी दोन ऑगस्टच्या दिवशी साधू वासवानी चौकातही अशाच प्रकारे चोरट्यांनी चारचाकीची काच फोडून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे.
भर दिवसा चोरी
चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भोसलेनगर येथे घराच्या राहत्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकीची काच फोडून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. या प्रकरणात ५२ वर्षीय व्यक्तीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या चारचाकीच्या मागील ‘सीट’वर ‘सॅक’ होती. त्यामध्ये ५० हजाराची रोकड होती. अज्ञाताने मागील काच फोडून पैसे चोरून नेले. चंदननगर परिसरात जुना मुंढवा रस्त्यावरील एका दुकानासमोर भर दिवसा चारचाकीची काच फोडून २५ हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली आहे.
कथित ‘भाई’च्या खुनाचा बदल्यासाठी येरवड्यात तोडफोड, हत्यारे हवेत भिरकावत दहशत माजवली
लक्ष्मी रस्त्यावरही चोरी
खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची आणि वाहनांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावर गरुड गणपती मंदिराच्या परिसरात पार्किंगमधील चारचाकीची काच फोडून बॅग चोरून नेण्यात आली. त्या बॅगेत चांदीची साखळी होती. या प्रकरणात २८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिकामी बॅग, पिशव्याही ठेवू नका
अनेकदा नागरिक किमती वस्तू नसल्याने सॅक किंवा पिशवी कारमध्ये सोडून जातात. मात्र, चोरटे ते मिळविण्यासाठी कारची काच फोडतात. कोणतीही वस्तू चोरीला जात नाही. मात्र, कारचे नुकसान होऊन मालकाला भुर्दंड सहन करावा लागतो.
Recover your password.
A password will be e-mailed to you.