
Tej Police Times
अमरावती जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अॅड. आंबेडकर यांनी सोमवारी स्थानिक शासकीय विश्रामगृहात विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.
‘राज्यात सध्या गरीब आणि श्रीमंत मराठा वाद सुरु आहे. श्रीमंत मराठ्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामधील पुढाऱ्यांना विकत घेतले आहे. पक्षांची सत्ता त्यांनी स्वत:कडे ठेवली आहे. हे तिन्ही पक्ष श्रीमंत मराठ्यांचे आहेत. राज्यात सध्या जे भांडण सुरू आहे. ते गरीब आणि श्रीमंत मराठ्यांचे आहे. त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात आहे,’ असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
राज ठाकरे म्हणाले, राज्यात आरक्षणाची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा ‘मनसे’ सल्ला
‘५५ लाख जात प्रमाणप्रत्रे रद्द करा’
‘येत्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना मान्य करून घेईल. तसेच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली जाईल, असा निर्णय घेतला जाईल, असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणा, असे आवाहन करीत आहोत. कुणबी ओबीसीमध्ये आहेत. ज्या कुणबी माणसाकडे कागदपत्रे आहेत, त्याला प्रमाणपत्र मिळणे हा त्याचा संवैधानिक अधिकार आहे. मात्र, तुम्ही घाई गडबडीत ५५ लाख कुणबी जात प्रमाणपत्र वाटप केले, त्याला आम्ही विरोध केला आहे. जात प्रमाणपत्र वाटणे, हे सरकारचे काम नाही. ज्यांनी तुमच्याकडे मागितलेच नाही. तरीही तुम्ही राजकारणासाठी ते देत आहात, ते थांबवा. ५५ लाख जात प्रमाणपत्रे रद्द करा,’ अशी आमची मागणी असल्याचे आंबेडकर म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.