Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Prakash Ambedkar: काँग्रेसच्या नेत्यांना कणाच नाही; प्रकाश आंबेडकर यांची अमरावतीमध्ये खोचक टीका

7

म. टा. वृत्तसेवा, अमरावती : ‘काँग्रेसच्या नेत्यांना कणा नाही. त्यांना कणा असता, तर ते झुकले नसते. शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षालाच खरी शिवसेना मानतात. लोकसभा निवडणुकीतील उद्धव ठाकरे यांची कामगिरी ही आरक्षणवादी आणि मुस्लीम मतांमुळे वाढली आहे. हे दोन्ही वर्ग धर्मवादी पक्षांचे मतदार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला कणा असता, तर ही वस्तुस्थिती त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडली असती. पण, काँग्रेस पक्षातील कोणीही नेता हे मांडायला तयारही नाही, अशी माझी माहिती आहे,’ अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केली.

अमरावती जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अॅड. आंबेडकर यांनी सोमवारी स्थानिक शासकीय विश्रामगृहात विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला.

‘राज्यात सध्या गरीब आणि श्रीमंत मराठा वाद सुरु आहे. श्रीमंत मराठ्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामधील पुढाऱ्यांना विकत घेतले आहे. पक्षांची सत्ता त्यांनी स्वत:कडे ठेवली आहे. हे तिन्ही पक्ष श्रीमंत मराठ्यांचे आहेत. राज्यात सध्या जे भांडण सुरू आहे. ते गरीब आणि श्रीमंत मराठ्यांचे आहे. त्याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाचा बळी दिला जात आहे,’ असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
राज ठाकरे म्हणाले, राज्यात आरक्षणाची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा ‘मनसे’ सल्ला
‘५५ लाख जात प्रमाणप्रत्रे रद्द करा’

‘येत्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना मान्य करून घेईल. तसेच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली जाईल, असा निर्णय घेतला जाईल, असे अनेक जण सांगत आहेत. त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणा, असे आवाहन करीत आहोत. कुणबी ओबीसीमध्ये आहेत. ज्या कुणबी माणसाकडे कागदपत्रे आहेत, त्याला प्रमाणपत्र मिळणे हा त्याचा संवैधानिक अधिकार आहे. मात्र, तुम्ही घाई गडबडीत ५५ लाख कुणबी जात प्रमाणपत्र वाटप केले, त्याला आम्ही विरोध केला आहे. जात प्रमाणपत्र वाटणे, हे सरकारचे काम नाही. ज्यांनी तुमच्याकडे मागितलेच नाही. तरीही तुम्ही राजकारणासाठी ते देत आहात, ते थांबवा. ५५ लाख जात प्रमाणपत्रे रद्द करा,’ अशी आमची मागणी असल्याचे आंबेडकर म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.