
Tej Police Times
महापालिका आयुक्त गगराणी यांच्या भेटीनंतर आशीष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधताना, सागरी किनारा तयार करताना टाकण्यात आलेल्या भरावातून १८० एकर जागा निर्माण झाली असल्याचे सांगितले. ‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या सागरी किनारा मार्गाच्या परवानग्या देण्यात आल्या होत्या. त्यावेळी केंद्रीय पर्यावरण खात्यानेही या जागेचा वापर कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी करण्यात येणार नाही, याचे प्रतिज्ञापत्र मुंबई महापालिकेने द्यावे, अशी अट घातली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर हे प्रतिज्ञापत्र केंद्रीय पर्यावरण विभागाला दिले गेले नाही. त्याबाबत ‘कॅग’नेही ताशेरे ओढले होते. केंद्रातील मंत्र्यांनी मागणी करूनही तसे प्रतिज्ञापत्र का दिले नाही’, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. यामध्ये कोणते अधिकारी होते, त्यांच्यावर दबाव होता का, याबाबतची चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली. या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव होता, असा आरोप करून शेलार यांनी याबाबत आदित्य यांनी उत्तर देण्याची गरज असल्याचेही सांगितले.
विधानसभेसाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, ‘या’ दिवशी दिल्ली दौरा करणार, बड्या नेत्यांची घेणार भेट
‘व्यावसायिक बांधकामास परवानगी नाही’
सागरी किनारा मार्गाच्या जागेत कोणत्याही व्यावसायिक बांधकामास परवानगी नाही. त्यामुळे मार्गाच्या मोकळ्या जागेत होर्डिंग्ज लावण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे यांना पत्राद्वारे कळवले आहे. महसूलात वाढ होण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर या मार्गालगतच असलेल्या भुलाभाई देसाई मार्ग येथील टाटा उद्यान या ठिकाणी डिजिटल होर्डिंग्जसाठी, लाला लजपतराय उद्यान, हाजी अली, महालक्ष्मी या ठिकाणीही होर्डिंग्जसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यासाठी वाहतूक शाखेचे ना हरकत प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए)यांचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असून, त्यानंतरच पुढील प्रक्रिय राबवली जाणार असल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.