तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

लग्नाला काहीच महिने अन् नवदाम्पत्याचा अंत, मृतदेह अशा परिस्थितीत आढळले की सारे हादरले

0 41

अहमदनगर: लग्नाला अवघे काही महिने झाले आणि नवदाम्पत्याने आपलं आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दोघांचे मृतदेह दोरीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. हे पाहून साऱ्यांना धक्का बसला. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत सध्या काहीही माहिती नाही. पण, त्यांच्या अशा जाण्याने सारेच हळहळले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. रविवारी (११ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. परंतू ही आत्महत्या आहे की अन्य काही प्रकार याबाबत संगमनेर येथील घारगाव पोलीस तपास करत आहेत.

नवविवाहित जोडपं मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

अहमदनगर येथील संगमनेर तालुक्यातील साकूर येथील वैभव दत्तात्रेय आमले (वय वर्ष २२) आणि स्नेहा वैभव आमले (वय वर्ष २०) या दोघांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतरच नवविवाहित दाम्पत्यांने रविवारी सायंकाळी साकूर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.

आत्महत्या की घातपात? तपास सुरु

सदर घटनेने साकूर पठार भागात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती समजतात स्थानिक रहिवासी आणि साकूर गावचे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला असून सदर घटना कशामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही. या नवदाम्पत्याने आत्महत्या केली की अन्य काही प्रकार आहे? आत्महत्या केली असेल तर त्यामागील नेमकं काय कारण असेल? याबाबत अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.