Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

9

मुंबई : कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध केला म्हणून प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे, असा गंभीर आरोप करून भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत

कृषी विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून शेतकऱ्यांचे भले करण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरी विरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
Ajit Pawar: मी कालच ६००० कोटींच्या फाईलवर सही केली आहे! अजित पवारांचा ‘लाडक्या बहिणीं’ना शब्द

नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वाटपाच्या १४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला श्रीमती राधा यांनी आक्षेप नोंदवला होता. खतांच्या खरेदीसाठी पीएम प्रणाम’ योजनेतंर्गत मिळणारे अनुदान हे २५० कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असे मत व्ही. राधा यांचे होते. शेतकरी सन्मान योजनेचा निधीचा एक हप्ता वळवण्यासही विरोध होता. या योजनेतील चौदाशे कोटी वळविण्याला त्यांनी विरोध केला. तरी मंत्री कार्यालयाचा निधी वळविण्याचा अट्टाहास होताच.
Mahayuti in Vidhan Sabha: लोकसभेत सपाटून हार, आता विधानसभेसाठी ‘अब की बार, २०० पार’, महायुतीचा काय आहे प्लॅन?

‘अनियमितता आहे-चौकशी करण्याची गरज’, व्ही राधा यांनी शेरा मारला, त्यामुळेच…

व्ही राधा यांनी निविष्ठा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता. फवारणी पंपाच्या खरेदीवर अनेक आक्षेप घेतला होता. ‘या अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता’ असल्याचा शेरा व्ही राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने व्ही राधा यांची बदली केली आहे.

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. हे दुर्दैव असून कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाईला आणणारा असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.