
Tej Police Times
महाराष्ट्रात द्वेषाचे कॉन्ट्रॅक्ट उद्धव ठाकरे यांनी घेतले आहे. अशा लोकांच्या बुडामध्ये घुसलेले धनुष्यबाण हे पाहिलं काढावं लागेल आणि त्यांना पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आलेली आहे. तसेच महाराष्ट्राला लागलेली कीड त्याचे नावच उद्धव ठाकरे आहे. आणि आता आम्ही ही कीड काढून महाराष्ट्र स्वच्छ करणार आहे. तसेच “महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना किंमत नाही. त्यांचा सकाळचा भोंगा (संजय राऊत) काहीतरी बडबडतो, त्यामुळे समोरच्या व्यक्तीसमोर त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही.” असे ही नितेश राणे म्हणाले
मनोज जरांगे यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही, त्यांनी राजकीय भाष्य टाळावे, हे त्यांच्यासाठी चांगले आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर बोलावे तर ते त्यांच्या हिताचे आहे. राणे म्हणाले, नाना पटोले आणि शरद पवार यांची भूमिका ओबीसींना आरक्षण न देता किंवा इतरांच्या आरक्षणाशी छेडछाड करण्याची आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची याबाबत कोणतीही भूमिका नाही. जरांगे पाटील कुठेतरी एकटे वाटत आहे. वेगळे मराठा आरक्षण देण्याची तयारी असेल, तर जरांगे यांनी त्यावर आपली भूमिका मांडावी, असेही नितेश राणे म्हणाले.
कर्जतमध्ये झळकले ‘सुपारीबाज’ फलक, काँग्रेसचे उत्तर तर मनसेने घेतले अंगावर; पुढील अपडेट १६ ऑगस्टला…
भाजप आमदार नितेश राणे पुढे म्हणाले, “जरांगे यांच्या राजकारणामुळे मराठा समाजाचे नुकसान होणार आहे. यावर मराठा समाज नक्कीच भूमिका घेईल. जरांगे यांनी पहिल्या दिवशी काही भूमिका मांडली असती तर ती विश्वासार्ह ठरली असती. आता सर्वांकडून दरवाजे बंद केले जात आहे.” त्यामुळे समाजातील लोक त्यांच्यापासून अंतर राखत आहेत, असेही नितेश राणे म्हणाले.
लव्ह जिहादच्या प्रकरणाबाबत राणेंनी पोलिसांवर मोठे आरोप केले. नितेश राणे म्हणाले, “हिंदू समाजात लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले की, पोलिस खात्यातील काही अधिकारी 10 ते 15 दिवस गुन्हा नोंदवत नाहीत. काही पोलिस अधिकारी पोलिस खात्याची बदनामी करत असून, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले जाते. त्यामुळे त्यांचे नावं खराब होत आहे.” नितेश राणे म्हणाले की, आम्ही अशा सडलेल्या आंब्यांना त्या पद्धतीबद्दल इशारा दिला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.