Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आईच्या मृत्यूनंतर सख्ख्या बहिण भावाने आयुष्य संपवले; सुसाईड नोट वाचून सर्वांना बसला धक्का

9

कोल्हापूर(नयन यादवाड): आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्या संभाजीनगर इथल्या नाळे कॉलनीत राहणाऱ्या भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी या बहिण भावाने आज राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हे दोघेही अविवाहित असून दोन्ही भावडांनी आपल्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये, असे त्यांच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.या घटनेची राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

आई आणि मुलांचं प्रेम हे जगावेगळं असते. जन्माच्या आधीपासून आळशी जुळलेली नाळ म्हणजे आपल्या मुलाला काय होत आहे हे न सांगता आईला कळत असत. असेच एक कुलकर्णी कुटुंब कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात राहत होत. मे 2024 मध्ये आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचा निधन झाले होते. यानंतर एकटे पडलेले भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी हे दोघेही बहिण भाऊ नैराश्येत होते. अनेक जणांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही बहिण भाऊ आईच्या आठवणीतून बाहेर पडत नव्हते.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेली कीड, पुढच्या निवडणुकीत जनता त्यांना साफ करेल; नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य

दोघेही उच्चशिक्षित असून अविवाहित होते. अखेर विरह सहन न झाल्याने या दोन्ही सख्या बहिण भावानी राजाराम तलावात उडी घेत आयुष्याचा शेवट केला. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले असून आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये, असेही या सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवण्यात आले आहे. या आत्महत्येची नोंद राजारामपुरी पोलिसांत करण्यात आलीय.
साताऱ्यात विचित्र अपघात; ST बसला आग, दुचाकीस्वाराचा आगीत होरपळून मृत्यू, थरारक घटनाचे व्हिडिओ

आईच्या निधनानंतर भूषण आणि भाग्यश्री हे असा टोकाचा निर्णय घेतली अशी शक्यता कोणालाच वाटली नव्हती. आईचे निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना धीर दिला होता. मात्र आई जाण्याच्या विहरातून हे दोघेही बाहेर पडले नाहीत. उच्चशिक्षित असेलल्या भूषण आणि भाग्यश्री यांच्या या टोकाच्या निर्णयाबद्दल संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.