
Tej Police Times
शंतनू अभ्यंकर यांना फुफ्फुसाचा कर्करोग जडला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेली काही दिवस त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. अखेर गुरूवारी दुपारी त्यांची कर्करोगाविरोधातली लढाई संपली. दीनानाथ मंगेशकर रुग्णायलाने त्यांना मृत घोषित केले.
शंतनू अभ्यंकर मूळचे साताऱ्यातील वाईचे. विविध लोकप्रिय वर्तमानपत्रांतून आणि अनेक सभा संमेलनातून महिलांच्या आरोग्यावर तसेच समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर ते लिहित असत. पुढच्या काही तासांत अभ्यंकर यांचे पार्थिव वाईला नेण्यात येणार आहे. अत्यंत चांगला डॉक्टर, प्रतिभावान, लेखक, तीव्र सामाजिक जाणीव असलेला विज्ञानवादी लोकविज्ञानचा शंतनू सोडून गेल्याची भावना सामाजिक वर्तुळातून व्यक्त होतीये.
शंतनू अभ्यंकर यांनी पुण्यातील बैरामजी जीजीभॉय अर्थात बी. जे.मेडिकल महाविद्यालयातून स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र या विषयात एम.डी. ही पदवी संपादन केली होती. अभ्यंकर १९९७ सालापासून साताऱ्याच्या वाईत वैद्यकीय व्यवसायात कार्यरत होते.
अभ्यंकर यांनी स्त्री प्रश्नांवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भूमिका मांडली. त्यांची स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र-तज्ज्ञ संघटनेच्या संचालक मंडळात, तसेच राष्ट्रीय कामविज्ञान समितीच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती.
त्याचबरोबर भाषांतरकार तसेच ब्लॉग लेखक आणि नाटककार अशीही त्यांची विशेष ओळख होती. स्त्रियांच्या आरोग्याबाबतीतल्या भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे २००७ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.