तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मोदींनी शरद पवार यांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख केल्याचा फटका बसला का? अजितदादा म्हणाले…

0 40

मुंबई : अजित पवार यांना पुन्हा पक्षात घेण्यासंबंधीचा निर्णय आमच्या पक्षातील प्रमुख लोक चर्चेअंती घेतील, असे विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. पवार यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीकडे प्रश्न नेला.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एएनआय वृत्तसंस्थेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत घेतली. लोकसभा निवडणूक निकाल, विधानसभेची तयारी, महायुतीचा मुख्यमंत्रिपदचा चेहरा, दोन्ही राष्ट्रवादीतील संघर्ष अशा मुद्द्यांवर एएनआयने अजित पवार यांना बोलते केले.
अजित पवार यांचे गुलाबी जॅकेट, शरद पवार यांचे मिश्किल उत्तर, पत्रकाराच्या प्रश्नावर शाळा घेतली

सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत उभे करायला नको होते, अशी स्पष्ट कबुली आपण दिलीत. मागील काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना पक्षात घेण्याविशषी वरिष्ठ नेते चर्चेअंती निर्णय घेतील, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांचे विधान पाहता, थेट आमंत्रण तर नाहीये परंतु तुमच्यासाठी दारे उघडी आहेत असे वाटते का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारला असता, नो कॉमेट्स… मला यावर अधिक काही बोलायचे नाही. सध्या कोण काय म्हटलंय आणि त्यावर तुमचे काय मत आहे, अशा प्रश्नांना मी उत्तरे देणार नाही. विकासाच्या राजकारणावर मी बोलेन, असे अजित पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे आमदार नसताना CM, पृथ्वीराजबाबा केंद्रातून राज्यात आले, मुख्यमंत्रिपदाला नशीब लागते : अजित पवार

दादांच्या प्रचाराची रणनीती

लोकसभेला अमुक मुद्द्यांवरच प्रचार असला पाहिजे, अशी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रणनीती ठरली होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र बसून प्रचाराचे मुद्दे निश्चित केले होते. विधानसभेलाही महायुती म्हणून सामोरे जाताना जनतेचा विश्वास आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. अर्थसंकल्पात जनहिताच्या अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत. जनतेचा विश्वास आम्हाला मिळेल, असे अजित पवार म्हणाले.
Jay Pawar : बारामती विधानसभेला जय पवार रिंगणात? अजितदादा म्हणाले सात-आठ वेळा लढलो, आता इंटरेस्ट नाही

मोदींनी शरद पवार यांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख केल्याचा फटका बसला का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा भटकती आत्मा असा उल्लेख केल्याचा फटका बसला का? असे विचारल्यावर, मागचे उगाळायचे नाही असे मी ठरवले आहे. भविष्यातील मुद्द्यांवर अधिक लक्ष केंद्रित करून चांगल्या परिणामाच्या दिशेने जाण्याचा मानस असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगवेगळे का लढणार?

स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगवेगळे लढण्याच्या घोषणेवर अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले- राज्य सरकारमध्ये एकत्र असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती-आघाडी म्हणून कुणी एकत्र लढत नाही. सगळे वेगवेगळेच लढतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने १५ वर्षे सरकार चालवले, पण त्या त्या वेळी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधात लढलो, असे अजित पवार यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.