तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

बंदूक काढली अन् स्वत:वर गोळी झाडली, कर्मचाऱ्यांसमोरच व्यापाऱ्याचं धक्कादायक पाऊल

0 34

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका हिरे व्यापाऱ्याने गेट वेच्या समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर आता पुन्हा एका व्यापाऱ्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. भेंडी बाजारातील एका व्यापाऱ्याने आपल्या कार्यालयातच स्वत:वर गोळी झाडून घेतली.

भेंडी बाजारात शुक्रवारी (१६ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास एका व्यावसायिकाने आपल्या कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या केली. जेजे मार्ग पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय व्यापारी इक्बाल मोहम्मद सिवानी यांनी शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास भिंडी बाजार परिसरातील अमीन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

व्यवसायात सतत तोटा, कर्ज अन् व्यापाऱ्याचं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, इक्बाल यांनी आत्महत्या केली तेव्हा कार्यालयातील इतर कर्मचारीही तेथे उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. मयत इक्बाल मोहम्मद हे कर्जाच्या विळख्यात होते, व्यवसायात सतत तोटा होत असल्याने ते तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कर्जामुळे आत्महत्या की आणखी काही? पोलिसांकडून तपास सुरु

इक्बाल मोहम्मद सिवानी यांच्या आत्महत्येमागे कर्ज हेच कारण होतं की आणखी काही कारण होतं, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी ज्या कार्यालयात इक्बाल मोहम्मद सिवानी यांनी स्वत: स्वत:वर गोळी झाडली ते कार्यालय सील केलं आहे, तसेचं घटनेत वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून. त्यांच्या शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफीही करण्यात येणार आहे.

हिरे व्यापाऱ्याची गेट वेच्या समुद्रात उडी

मुंबईतील ६५ वर्षीय हिरे व्यापारी संजय शांतीलाल शहा यांनी २२ जुलैला कुलाबा येथील ताज हॉटेलजवळ समुद्रात उडी घेत स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. आर्थिक संकटात असल्याने तणावाखाली येऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं. मॉर्निंग वॉकला जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी गेट वेजवळ समुद्रात उडी घेतली. त्यांचा हिरे-खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. पण, गेल्या काही वर्षांपासून त्यांना नुकसान होत असल्याने ते आर्थिक संकटात होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.