
Tej Police Times
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावतात. सततच्या पावसामुळे महामार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवताना वाहनांची दिशा बदलते त्यामुळे अपघात होण्याचा संभव असतो. महामार्गावरील दुभाजकांमुळे काही वाहने हे विरुद्ध बाजूने ये-जा करतात त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अपघाताला आमंत्रण दिले जाते.
एकंदरीत महामार्गावरील वाहनांना वेग आला असून कमी वेळेत नागरिक ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. मात्र, वाहनांमधील प्रवासी आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. महामार्गामुळे एका बाजूला कनेक्टिव्हिटी वाढलेली असली तरी दुसऱ्या बाजूला अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांचा अपघात जर झाला तर तो सुद्धा जीवघेणा ठरत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.