Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शेतातून मोठा आवाज आला आणि… शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या मायलेकीवर काळाचा घाला

9

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शेतात मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या दोन मायलेकींच्या अंगावर वीज पडून दोघींचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना १८ ऑगस्टला, रविवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील शिसारखेडा येथे घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

रेणुका हरिदास राऊत (वय ३८) आणि स्वाती हरिदास राऊत (वय १५) असं वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या माय लेकींची नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काय दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने दांडी मारली होती. गेले तीन दिवस झाले शहरामध्ये उष्णतेचं वातावरण होतं.
Satara News : महाबळेश्वरहून फिरण्यासाठी महाडला, आनंदी कुटुंबावर शोककळा; सावित्री नदीत बुडून तिघांचा मृत्यू
आज रविवारी १८ रोजी दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर प्रचंड वाढला. सिसारखेडा सह परिसरात अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी सिल्लोड तालुक्यातील शिसारखेडा या गावात शेतात काम करण्यासाठी गेलेल्या रेणुका राऊत आणि स्वाती राऊत या दोन मायलेकींच्या अंगावर वीज पडली. सिसारखेडा येथील गट नं ३० मध्ये दोघींचा जागीच मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhaji Nagar News : लोकसभेत मुस्लिमांची साथ, ठाकरेंनी वारं फिरवलं; आता विधानसभेसाठीही इच्छुकांची गर्दी वाढली
विजेचा मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी तात्काळ धाव या दोघींचा मृत्यू झाला त्या शेताकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच दोघींना ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने सिल्लोड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. दोघींच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू असा मोठा परिवार आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आज रविवारी नाशिक येथे कसारा घाटात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. कसारा घाटात दूधाच्या कंटेनरला मोठा अपघात झाला. वाहन चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळला. यात एका चिमुकल्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.