Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vidhan Sabha: मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल संजय राऊतांनी बोलू नये, काँग्रेस आमदाराचा सल्ला

7

म.टा.प्रतिनिधी, नागपूर : विधानसभा निवडणूका महाविकास आघाडी एकत्रितपणेच लढवणार आहे. त्यामुळे पक्षातील नेते कुठल्या जागांवर दावा करत असतील ते करण्याचा अधिकार त्यांना आहे. पण, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण राहील हे ठरवण्याचा अधिकार केवळ प्रत्येक पक्षाच्या हायकमांडला आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांमध्ये अशी चर्चा करू नये असा सल्ला उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी दिला आहे.रविवारी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबाबत माध्यमांमध्ये वक्तव्य करून चर्चा होऊ शकत नाही. संजय राऊत यांना मुख्यमंत्री पदाबाबत आमच्या हायकमांडशी चर्चा करावी लागेल. ते किवा मी हे ठरवू शकत नाही. त्यामुळे माध्यमात अशाप्रकारचे वक्तव्य करणे टाळावे असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
Chief Minister Of Maharashtra: मला मुख्यमंत्री बनायचं असं उध्दव ठाकरे यांनी कधीच सांगितलेलं नाही, मात्र…; पाहा संजय राऊत पुढे काय म्हणाले

जनतेचा कौल कोणाला?

महाविकास आघाडीच्या निवडणूकपूर्व सर्वेबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, या सर्वेत ज्यांच्या जास्त जागा येतील हे दाखवले आहे. त्यांनी लढावे असे आमचे मत आहे. आमच्या सर्वेनुसार विदर्भातील ६२ जागा आमच्या बाजूने आहेत, असा आमचा सर्वे सांगतो. तुम्हाला आमच्या सर्वेवर काही आक्षेप असेल तर तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे निर्णय घेत जगातील सर्वोत्कृष्ट सर्वे करणाऱ्या कंपनीकडून तो करून घ्यावा असा सल्लाही त्यांनी महाविकास आघाडीला दिला.

काँग्रेसचा विधानसभेसाठी प्लान काय?

विधानसभेच्या तोंडावर राज्यात काँग्रेसकडून सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. लोकसभेतील यशानंतर आता विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांसाठी चाचपणी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीसोबत युतीमध्ये असणाऱ्या काँग्रेसला लोकसभेत जास्त जागा राज्यातून मिळाल्या होत्या. अशातच आता आगामी विधानसभेसाठी सुद्धा काँग्रेसने तयारीला लागले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमरावतीत काँग्रेसची बैठक झाली.चेन्नीथला म्हणाले,आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटप करताना मुंबईत बसून निर्णय घेतले जाणार नाही. स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच तिकीट वाटप केले जाईल. आता त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन काही जागांवर वाद होण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.