तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

भाजपला धक्का ! समरजीतसिंह घाटगे यांनी शरद पवार गटात जाण्याचा घेतला निर्णय

0 33

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Aug 2024, 8:33 pm

samarjit singh join ncp sharad chandra pawar party : समरजीतसिंह घाटगे यांनी अखेर भाजपला राम राम ठोकला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत गैबी चौकात पक्ष प्रवेश होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये महायुतीला विशेषत: भाजपला मोठा धक्का बसला आहे. समरजीतसिंह घाटगे यांनी अखेर भाजपला राम राम ठोकला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३ सप्टेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत गैबी चौकात पक्ष प्रवेश होणार आहे. कागल विधानसभा निवडणूक लढण्यासाठी अपक्ष म्हणून जनतेसमोर जायचं की हाती तुतारी घ्यायची याचा निर्णय समरजीतसिंह घाटगे यांनी घेतलेला असून कार्यकर्त्यांच्या साक्षीनं त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

भाजपच्या नेत्यांना भेटून हा निर्णय घेतला

समरजीतसिंह घाटगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” हा निर्णय घेताना मी भाजपच्या सर्व नेत्यांना भेटून सांगितला आहे. मला विधान परिषदेसाठी कोणताही रस नव्हता यामुळे मी हा निर्णय घेतला. बावनकुळे मला विधान परिषद देणार संदर्भात बोलत होते मात्र मला त्यात इंटरेस्ट नाही. मी भाजपमध्ये विधान परिषदेचा आमदार व्हायला आलेलो नव्हतो तर कागलच्या विकासासाठी आलो होतो. गेल्यावेळी देखील नाईलाज म्हणून मला अपक्ष लढावं लागलं.

Rahul Desai : कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का! जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी दिला राजीनामा

देवेंद्र फडणवीस माझ्या भावासारखे

समरजीतसिंह घाटगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ”माझे आणि फडणवीस यांचे मैत्री पलीकडचे संबंध आहेत. मी राजकारणासाठी मैत्री आणि शत्रूता करत नाही देवेंद्र फडणवीस हे माझ्या भावासारखे आहेत. मात्र हे कुरुक्षेत्र आहे त्यांना त्यांचे राजधर्म आणि मला माझं राजधर्म करावा लागेल. येत्या काळात काही गोष्टी घडवायच्या आहेत यामुळे तुतारी हातात घेतली”. असं घाटगे म्हणाले आहेत.

महायुतीमध्ये असलेले हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभेचे तिकीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे समरजीतसिंह घाटगे दुखावलेले होते. पुढचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करू असे त्यांनी सांगितले होते. मागील १५ दिवसांपासून आगामी राजकीय समीकरणांबाबत ते चाचपणी करत होते. आज अखेर समरजीतसिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.