Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात, दुचाकीवरील तरुणांना चिरडले, दोघांचा दुर्दैवी अंत

8

Edited byविमल पाटील | Authored by संतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Aug 2024, 1:48 pm

Satara MLA Jaykumar Gore Convoy car Accident: माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दहिवडीजवळ शेरेवाडी फाटा येथे हा अपघात घडला आहे. अपघात एवढा भीषण होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सातारा : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीने स्कुटीवरील दोन जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दहिवडीजवळ शेरेवाडी फाटा येथे हा अपघात घडला आहे. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. दुर्घटनेत स्कुटीवरील दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

वृत्तानुसार, आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडी दहिवडीनजीकच्या शेरेवाडी फाटा येथून जात असताना एका स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ३० वर्षीय विवाहित रणजीत मगर आणि २५ वर्षीय अनिकेत मगर यांचा मृत्यू झाला आहे. अनिकेत व रणजीत दोघेही शेरेवाडी फाट्याहून बिदालच्या दिशेने स्कुटीवरुन निघाले होते. यादरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ देखील भरधाव वेगात दहिवडीच्या दिशेने जात होती. यावेळी शेरेवाडी फाटा येथे स्कार्पिओ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. त्यावेळी समोरून स्कुटीवरून येणाऱ्या रणजीत व अनिकेतला चिरडून स्कॉर्पिओ ५० मीटर अंतरावर पुढे गेली. यामध्ये अनिकेत व रणजीत दोघे गंभीर जखमी झाले. एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
Satara News : महाबळेश्वरहून फिरण्यासाठी महाडला, आनंदी कुटुंबावर शोककळा; सावित्री नदीत बुडून तिघांचा मृत्यू
घटनेत आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दहिवडी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

अंबरनाथमध्ये कारच्या धडकेत ५ जण गंभीर जखमी

बदलापूर-अंबरनाथ मार्गावरील हॉटेल एस ३ पार्कच्या कारने अनेकांना धडक दिल्याची घटना काल मंगळवारी समोर आली होती. घरगुती वादातून ३८ वर्षीय मुलाने फिल्मी स्टाईलने कार चालवत वडिलांच्या कारचा पाठलाग करत जोरदार धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना बदलापूर – अंबरनाथ मार्गावरील चिखलोली गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल एस ३ पार्कच्या समोर घडली होती. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात वडील बिंदेश्वर शर्मा (वय ६२, रा. कुलाबा मुंबई ) यांच्या तक्रारीवरून मुलगा सतीश शर्मा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.