Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लाडकी बहिण योजनेसंदर्भात राज ठाकरेंचं मोठं विधान

8

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Aug 2024, 4:26 pm

raj thackeray on state government : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून राज्य सरकारवर सणसणीत टीका केली आहे. लोकांना सर्व काही गोष्टी फुकट देऊ नका, लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. त्यांच्या हाताला काम हवं आहे. असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून राज्य सरकारवर सणसणीत टीका केली आहे. ”लोकांना हाताला काम हवं आहे. नुसते पैसे नको” असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे सध्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर फिरत आहेत.

लोकांना काहीच फुकट नको असतं

राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत राज्यातील घडामोडींवर आपले मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, ” लोकांना सर्व काही गोष्टी फुकट देऊ नका, लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. त्यांच्या हाताला काम हवं आहे. नुसते पैसे नको, शेतकऱ्यांना सुद्धा फुकट वीज नको असते त्यांना स्वस्त आणि 24 तास वीज हवी असते. अशा योजना राज्यासाठी घातक आहेत”.

आरक्षणावरून शरद पवारांवर हल्लाबोल

राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात सुरू झालेल्या वादावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. राज ठाकरे म्हणाले की, ”1991 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासूनच या राज्यात जातीचे राजकारण सुरू झाले. आधी नेते आणि पक्ष फोडले गेले, नंतर जातीच्या नावावर भांडणे झाली. पूर्वी कोणीही महापुरुष जातीच्या नावाने ओळखले जात नव्हते, पण पवारांच्या राजकारणामुळे महापुरुष जातीच्या आधारावर विभागले गेले आहेत.”
Raj Thackeray: आदित्य ठाकरेच काय, शिंदे-फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार, राज ठाकरेंचा इरादा पक्का

विधानसभेत जनता धडा शिकवेल

गेल्या पाच वर्षातील राज्यातील राजकीय घडामोडीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ”गेल्या पाच वर्षात राज्यातील जनतेवर झालेल्या यातना जनता विसरलेली नाही. राज्याचे राजकारण आता एकप्रकारे चकचकीत झाले आहे. ही स्थिती एका वर्षात राज्यात निर्माण झालेली नाही आणि जनताही ती विसरणार नाही आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा राग नक्कीच काढेल”.

दरम्यान, विदर्भ दौऱ्याचा एक भाग म्हणून ठाकरे शुक्रवारी नागपुरात पोहोचले आहेत . त्यानंतर त्यांनी आज रविभवन येथे पक्षाचे नेते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.