
Tej Police Times
राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत राज्यातील घडामोडींवर आपले मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, ” लोकांना सर्व काही गोष्टी फुकट देऊ नका, लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. त्यांच्या हाताला काम हवं आहे. नुसते पैसे नको, शेतकऱ्यांना सुद्धा फुकट वीज नको असते त्यांना स्वस्त आणि 24 तास वीज हवी असते. अशा योजना राज्यासाठी घातक आहेत”.
राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात सुरू झालेल्या वादावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. राज ठाकरे म्हणाले की, ”1991 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासूनच या राज्यात जातीचे राजकारण सुरू झाले. आधी नेते आणि पक्ष फोडले गेले, नंतर जातीच्या नावावर भांडणे झाली. पूर्वी कोणीही महापुरुष जातीच्या नावाने ओळखले जात नव्हते, पण पवारांच्या राजकारणामुळे महापुरुष जातीच्या आधारावर विभागले गेले आहेत.”
Raj Thackeray: आदित्य ठाकरेच काय, शिंदे-फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार, राज ठाकरेंचा इरादा पक्का
गेल्या पाच वर्षातील राज्यातील राजकीय घडामोडीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ”गेल्या पाच वर्षात राज्यातील जनतेवर झालेल्या यातना जनता विसरलेली नाही. राज्याचे राजकारण आता एकप्रकारे चकचकीत झाले आहे. ही स्थिती एका वर्षात राज्यात निर्माण झालेली नाही आणि जनताही ती विसरणार नाही आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा राग नक्कीच काढेल”.
दरम्यान, विदर्भ दौऱ्याचा एक भाग म्हणून ठाकरे शुक्रवारी नागपुरात पोहोचले आहेत . त्यानंतर त्यांनी आज रविभवन येथे पक्षाचे नेते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.
लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.