Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Rajkot Killa : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे राजकीय कट, CCTV तपासा भाजप नेत्याची मागणी

11

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे.पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे तो पुतळा कोसळला असा आरोप केला आहे.तर विरोधकांनी मुद्दाम पुतळा पाडला असून सीसीटीव्ही फुटेज तपासा अशी मागणी भाजप नेत्याने केला आहे.
PM मोदींच्या हस्ते लोकार्पण केलेला छत्रपतींचा पुतळा कोसळला! विरोधकांची कडाडून टीका

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हा राजकीय कट असल्याचा भाजपने आरोप केला आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी घटना घडवली आहे, सीसीटीव्ही फुटेजसह सॅटॅलाइट फुटेज तपासण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केली आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केला असावा अशी शक्यता काळसेकरांनी मांडली आहे.राज्याच्या गृह खात्याने आणि केंद्रीय गृह खात्याने चौकशी करावी असे काळसेकर म्हणाले. ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता.या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. यावर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामात असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांच्यासह पुतळा उभारणीच्या कामात असलेल्या व्यक्तींवर मालवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे. सर्व शिवप्रेमींची घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारु असे बोलताना चव्हाणांनी संकेत दिले आहेत. दरम्यान स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा राजकोट येथे भेट देत पाहणी केली. आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत,शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.