Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

MH Election 2024 : हर्षवर्धन पाटील पवारांची ‘तुतारी’ फुंकणार? की भाजपात राहणार? त्यांनी स्पष्टच सांगितलं

8

पुणे : पुढील काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. याबाबतची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. अशातच महायुतीमध्ये नाराजीचे चित्र पाहायला मिळतंय. आणि त्याचा थेट फायदा विरोधक उचलताना दिसत आहेत. कोल्हापूरमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपला राम राम ठोकला असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. अशातच आता माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील भाजप सोडण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहेत. आज पुणे येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पुण्यातील मांजरी येथे संपन्न झाली. या बैठकीला साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप देशमुख आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. आढावा बैठक आटोपल्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा झाली. हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरलेला असताना या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

बैठकीत काय चर्चा झाली?

हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे ते म्हणाले की, ” आज मी अडीच तास पवार साहेबांसोबत होतो.आज शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. बावनकुळे साहेब जेष्ठ नेते आहेत ते कोणत्या रेफरन्सने बोलले याची मला माहिती नाही. अद्याप पर्यंत मी कोणाच्या संपर्कात नाही. कोणी मला एप्रोच झालं नाही.एक गोष्ट खरी आहे की अजित पवारांचे दौरे चालू आहेत. चर्चा अशी आहे की ज्या तालुक्यात ज्याचा आमदार सीटिंग असेल त्याला तिकीट दिलं जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे की मी लढावं”.
बैठक VSI ची… शरद पवारांनी संधी साधली, हर्षवर्धन पाटील आणि विवेक कोल्हेंशी गुफ्तगू, तुतारी फुंकणार?

फडणवीसांच्या निर्णयाची मी वाट पाहतोय

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, ”लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार स्वतः म्हणाले की, देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याविषयी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. देवेंद्र फडणवीस हे मला म्हणाले की मी त्यासंदर्भातला निर्णय घेईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याची मी वाट पाहत आहे. तीन आठवड्यापूर्वी याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चर्चा झाली ते म्हणाले निर्णय घेऊ. आम्ही कायमच लोकांच्यामध्ये असतो. आम्हाला तयारीची गरज नाही. देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय भूमिका घेतात हे बघू. मी लढावं हा कार्यकर्त्यांचा ,जनतेचा रेटा आहे. तो आवाज आहे आणि तो आवाज आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. ते योग्य निर्णय घेतील.” असं म्हणत निर्णयाचा चेंडू हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात टोलावला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.