
Tej Police Times
लोटांगण घातल्यानंतर प्रतिक्रियेत मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर म्हणाले की, महाराजांनी दिलेली शिकवण आम्ही पाळू शकलो नाही, याची आज खंत वाटते. ३५० वर्षांपूर्वी महाराजांनी उभारलेले गड किल्ले आजही दिमाखात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे. परंतु आज आपण महाराजांचे उभे केलेले पुतळे सुद्धा सांभाळू शकत नाही याची खंत वाटते. नौदलाने उभा केलेला महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो हे दुर्दैव आहे असेही खेडेकर म्हणाले.
Ajit Pawar: पळून पळून कुठे जाईल? दोषींवर कारवाई होणारच, राजकोटाच्या पाहणीनंतर अजितदादांचा शब्द
शिवरायांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. यातच आता मनसेने देखील सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत ही घटना घडणे दुर्दैवी आहे आणि याची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी मनसेने केली आहे.
दरम्यान, खेडेकर यांनी भविष्यात याठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणच्या वतीने आम्ही एक भव्य असा पुतळा उभारू असे सांगितले आहे. यावेळी त्यांच्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवतेज पुन्हा तळपणार! राजकोटवर भक्कम शिवपुतळा उभारण्याच्या सरकारच्या हालचाली
मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांची भेट घेतली. यावेळी वैभव खेडेकर यांनी या दुर्घटनेवरून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर दोघांनाही खडेबोलही सुनावले आहेत. यावेळी खेडेकरांसोबत मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.