Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

राणे नगरला आले, बोलून गेले; विखे पाटील म्हणाले… वातावरण कोणी बिघडविले तर माझ्याशी गाठ

12

Maharashtra Politics: शिर्डी मतदारसंघात जाती-धर्मावरून द्वेष पसरवला दर माझ्याशी गाठ आहे अशा शब्दात माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता भडक भाषणाला विरोध केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अहमदनगर (विजयसिंह होलम) : सकल हिंदू समाज मोर्चाच्या माध्यमातून भाजपचे आमदार नितेश राणे राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढत आहेत. तेथे त्यांची आक्रमक भाषण होत आहेत. त्यांना त्यावर मुस्लिमांकडून विरोधही होत आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीत फारसा चालला नाही. त्यामुळे भाजपमधील नेते मंडळीही याबाबत सावध झाली आहेत. राणे यांना आता स्वत:च्या पक्षातील नेत्यांकडूनही विरोध होताना दिसू लागला आहे. नगर जिल्ह्यातही राणे नुकतेच येऊन गेले. त्यानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राणे यांचे नाव न घेता अशा भडक भाषणाला विरोध केला आहे. शिर्डीत वातावरण कोणी बिघडविले तर माझ्याशी गाठ आहे, असा इशार विखे पाटील यांनी दिला आहे.

डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम राहिले पाहिजे. तीस वर्षांत आम्ही कधीही जात विचारली नाही. मात्र, हल्ली जातीचे विष पसरवणारे लोक जनतेला आता नको झाले आहे. शिर्डी मतदारसंघात जाती-धर्मावरून द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे,’ असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी दोन दिवसांपूर्वी नगर आणि श्रीरामपूरला येऊन गेलेले भाजचे आमदार नितेश राणे यांच्याकडे त्यांचा रोख असल्याचे सांगितले जाते.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल; म्हणाले होते, कोणी मस्ती केली तर किड्या-मकोड्यासारखे मारू

शिर्डीत आयोजित एका कार्यक्रमात विखे बोलत होते. ते म्हणाले. ‘याच शिर्डीमध्ये साईबाबांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आणि तो संदेश आपल्याला भविष्यात देशभराला द्यायचा आहे. सध्या जनतेच्या गरजा महत्त्वाच्या आहेत. तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, हे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे नाही,’ असेही विखे म्हणाले.

Sujay Vikhe: राणे नगरला आले, बोलून गेले; विखे पाटील म्हणाले… वातावरण कोणी बिघडविले तर माझ्याशी गाठ

महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे नगर आणि श्रीरामपूरमध्ये आमदार राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हाही राणे यांच्याविरूद्ध दाखल झाला आहे. त्यामुळे विखे पाटील यांचा इशारा राणे यांनाच उद्देशून असल्याचे बोलले जात आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.