Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Eknath Shinde On Elections: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका कधी? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मोठे संकेत

8

Eknath Shinde On Elections: राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार, याविषयी उलटसुलट तर्क लढवले जात आहेत. या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचा जावईशोधही काहींनी लावला आहे.

महाराष्ट्र टाइम्स
eknath shinde og.
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका नेमक्या कधी होणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात असतानाच, दोन महिन्यांनंतर; नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले. त्यामुळे आता त्या दृष्टीने राजकारणाची चक्रे फिरायला सुरुवात झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीर यांच्यासोबतच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होतील, असे वाटत होते. मात्र या राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना, सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या निवडणुका उशिराने होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. साहजिकच आता राज्यातील विधानसभा निवडणुका कधी होणार, याविषयी उलटसुलट तर्क लढवले जात आहेत. या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचा जावईशोधही काहींनी लावला आहे.

या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी चांदिवली येथील कार्यक्रमात बोलताना, दोन महिन्यांनंतर; नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य केले. निवडणुकीचा उल्लेख करताना, चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. काही दिवसांपूर्वीच महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनीही मुंबई उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीमध्ये राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यातच पार पडणार असल्याचे म्हटले होते.
Mahayuti News: महायुतीत शिंदेच मोठे भाऊ? विविध सर्वेक्षणांमध्ये शिवसेना आघाडीवर असल्याचे चित्र
‘मविआचा मुख्यमंत्री निवडणुकीनंतरच ठरेल’
कोल्हापूर :
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री हा निवडणुकीतील आकडेवारीवर ठरेल असे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी स्पष्ट केले. आताच चेहरा देण्याचा आग्रह कशाला, असा सवालही केला. ज्याचे ज्यादा आमदार त्याचा मुख्यमंत्री हाच फॉर्म्युला जाहीर केला. तीन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले १९७८मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणाचा चेहरा नव्हता. निवडणुकीनंतर मोरारजी देसाई यांना पंतप्रधान करण्यात आले. आत्ताही महाविकास आघाडीचा चेहरा जाहीर करायची गरज नाही. त्याचा विचारही करण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीनंतर मताच्या आकडेवारीवर मुख्यमंत्री ठरेल. तो कोणाचा असेल तेही ठरेल. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आपण राजकारण करत नाही. पण एवढी मोठी घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. लोकांची प्रतिक्रिया आहे, यात कसल राजकारण असा सवाल त्यांनी केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.