
Tej Police Times
मागील वीस दिवसात दोन पीएम मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. ३० ऑगस्ट शुक्रवारी रोजी मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर मोदी आले होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला मोदींनी भेट दिली. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते पालघरला रवाना झाले, पालघर येथील सिडको ग्राऊंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय मोदी यांच्या हस्ते मत्स्यव्यवसायासंबंधी २१८ प्रकल्पांचे भूमिपूजनही पार पडले. सुमारे १५६० कोटी रुपयांचे हे प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. या उपक्रमांमुळे मासेमारी क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढेल, तसेच पाच लाख रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव येथे विमानतळ परिसरात रविवारी २५ ऑगस्ट रोजी ‘लखपती दीदी’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदींनी आधीच्या सरकारची ७० वर्षांतील कामांचा पाढा वाचून दाखवला. काय म्हणाले मोदी, माझ्या सरकारच्या काळातील कामे पाहा, आमच्याइतकी महिला सक्षमीकरणाची कामे कुणी केली नाहीत,’ असा दावाही मोदी यांनी केला. एक कोटी महिला लखपती ‘तीन कोटी महिलांना लखपती करण्याचे आश्वासन लोकसभेत दिले होते. त्यानुसार एक कोटी महिला लखपती झाल्या आहेत. मागील दोन महिन्यांत ११ लाख लखपती दीदी झाल्या आहेत,’ असे सांगून मोदी यांनी आम्ही २० लाखांपर्यंत मुद्रा कर्ज देणार आहोत, असेही जाहीर केले.
लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.