
Tej Police Times
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील तिघेजण पहाटे दीडच्या सुमारास नाशिकच्या बाजूने पुण्याकडे जात असताना एका खासगी ट्रॅव्हल्सने जोरात धडक दिली. या घटनेनंतर ट्रॅव्हल्सचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी त्याला पाठलाग करून पकडले आणि चोप दिला. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तुकाराम जानकु गारे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे करत आहेत.
या घटनेमुळे या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, यामुळे तिघांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.