Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pitru Paksha 2024: यम, कावळा आणि पिंडस्पर्शाचा संबंध काय? जाणून घ्या पितृपक्षाबद्दल काही रंजक गोष्टी

9

Feeding Crows During Pitru Paksha: पितृपक्ष सुरु झाला की श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात. पितृ पंधरवड्यात पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यांना जेवण देवून त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यासोबत राहावी म्हणून प्रार्थना केली जाते. या पितृपक्षात एका पक्ष्याला खूप मोठा मान असतो आणि तो पक्षी म्हणजे ‘कावळा’, त्याला अगदी बोलावून जेवण दिले जाते. तुम्ही पाहिलं असेल मनुष्याच्या मृत्यूनंतर ‘काकस्पर्श’ महत्त्वाचा मानतात. यामागे काय कारण असावे. कावळा आणि पिंडस्पर्श यांचा काय संबंध आहे? चला वाचूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Importance of Crow In Pitru Paksha:

तुम्ही पाहिलं असेल कावळ्याने पिंडाला किंवा अन्नाला स्पर्श केला म्हणजे मृत व्यक्तीच्या इच्छा पूर्ण झाल्या असे समजले जाते. असेही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्ष प्राप्तीसाठी तळमळतो त्यावेळी कावळा त्याला स्वर्गाचे द्वार उघडून देतो. तर असा हा कावळा पितृपक्षात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि मुख्यत्वे इच्छा पूर्ण झाली तरच कावळा पिंडाला स्पर्श करतो, आता तुम्ही विचार करत असला असे का? चला तर वाचूया पुराणात याबद्दल काय काय सांगितले आहे.

यमाने धारण केले कावळ्याचे रूप

हिंदू धर्मात तीन दंडनायक आहेत, यमराज, शनिदेव आणि भैरव. यमराजाला ‘मार्कण्डेय पुराण’नुसार दक्षिण दिशेचे ‘दिक्पाल’ आणि ‘मृत्यूची देवता’ म्हणतात. पुराणानुसार यमराजाचा रंग हिरवा आहे आणि त्यांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले आहे. स्कंदपुराणात कार्तिक कृष्णा त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केले जाते. दक्षिण ही यमाची दिशा आहे. अशा शक्तिशाली यमाने एकदा घाबरून कावळ्याचे रूप धारण केले होते.

मरुत राजाच्या यज्ञात आला रावण

रामायणातील उत्तराखंडात ही गोष्ट सांगितेलेली आहे. राजा मरुत महाप्रतापी, पराक्रमी आणि किर्तीवान राजा होता. एकदा मरुत राजाने यज्ञाचे आयोजन केले. शंभुमहादेवाला उद्देशून हा यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या यज्ञासाठी ऋषीमुनी तसेच देवदेवता उपस्थित होत्या. या यज्ञासाठी इंद्र, वरूण आणि यम हे देवही खास उपस्थित होते. महेश्वरासाठी असलेल्या या यज्ञात अचानक रावण त्याच्या सैन्यासह आला. रावणाची दृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून इंद्र,वरुण आणि यम यांनी तात्काळ वेगवेगळ्या पक्ष्यांची रूपे धारण केली. त्याचे वर्णन करताना रामायण उत्तरकाण्डात म्हटले आहे,

इन्द्रो मयूरः संवृत्तो धर्मराजस्तु वायसः |
कृकलासो धनाध्यक्षो हंसश्च वरुणोऽभवत् ||
(रामायण उत्तरकाण्ड १८.५)

इंद्र मयुर, वरुण हंस तर यमराजांनी घेतले कावळ्याचे रूप

इंद्र मयुर, वरुण हंस तर यमराजांनी कावळ्याचे रुप धारण केले. जेव्हा रावण दृष्टीआड झाला त्यावेळी इंद्र, वरुण आणि यम त्यांच्या मुळ रुपात आले. दरम्यान राजा मरुताने रावणाविरुद्ध लढण्यासाठी तलवार म्यानातून बाहेर काढली पण ऋषीमुनी म्हणाले, ‘राजन तुम्ही यज्ञाला सुरुवात केली आहे. जर यज्ञाच्या वेळी तुमच्या हातून पाप घडले तर तुमच्या वंशाची वाढ होणार नाही. शंभोमहादेवाचा कोप तुम्हाला सहन करावा लागेल.’ हे ऐकून राजा मरुत काहीच करु शकले नाहीत. रावण यावर खुष झाला आणि शुक्राचार्यांनी त्याला विजयी घोषीत केले, अशी ही कथा सांगितली जाते.

इंद्रदेवाकडून पक्ष्यांना वरदान

या कथेनुसार रावणापासून लपण्यासाठी ज्या ज्या पक्ष्यांची मदत घेतली त्यांना इंद्र, वरुण आणि यमाने वरदान प्रदान केले. इंद्राने मयुराला सर्पाच्या भयापासून मुक्ती दिली. वरुणदेवाने हंसाला वरदानस्वरूप चंद्राप्रमाणे चमकणारा सुंदर शुभ्र वर्ण आणि समुद्राच्या फेसाप्रमाणे तकाकणारी कांती प्रदान केली. तर यमराजांनी कावळ्याला मृत्यभयापासून मुक्ती प्रदान केली. यमलोकामध्ये असलेल्या जीवांचे पोट तेव्हाच भरेल जेव्हा कावळ्याचे पोट भरेल आणि त्या लोकांना तृप्ती मिळेल, असा आशीर्वादसुद्धा दिला. म्हणून कावळ्याला यमाचा संदेशवाहक असेही म्हणतात.

कावळा यमराजाचा द्वारपाल

या वरदानामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात आणि त्यामुळे पितरांना तृप्ती मिळते, अशी मान्यता आहे. दरम्यान इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत यमराज कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही, असेही म्हणतात. मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते, असे मानले जाते. पण प्रत्यक्षात जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करत असतो. जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. कावळा वैवस्वत कुळात जन्माला आलेला असून सध्या वैवस्वत मन्वंतर सुरू आहे. जोपर्यंत हे मन्वन्तर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे. म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल, असे म्हणतात. एकूणच काय यमराजांनी कावळ्याचे रुप घेवून एका अर्थाने त्याचा उद्धारच केला आहे असे म्हणायला हवे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.